कोल्हापूर विमानतळाचे नवीन टर्मिनल मार्च २०२३ पर्यंत होणार पूर्ण

    19-Aug-2022
Total Views | 184
kolhapur
 
 
 
मुंबई: महाराष्ट्रातील कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत मार्च २०२३ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे, सध्या ६० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. एअरसाईड सुविधा अपग्रेड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. भविष्यातील वाहतूक वाढीसाठी एक नवीन हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर देखील बांधला जात आहे. शंभरहून अधिक कार आणि दहा बसेसची क्षमता असलेले पार्किंग क्षेत्र देखील विकास उपक्रमांचा भाग आहे. कोल्हापूर विमानतळावरील प्रचंड प्रवासी वाहतूक वाढ लक्षात घेऊन, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या वाढीव क्षमतेसाठी विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे.
या संपूर्ण विकास प्रकल्पात नवीन टर्मिनल इमारत बांधणे, विद्यमान धावपट्टी मजबूत करणे, धावपट्टीचा विस्तार करणे, नवीन ऍप्रन आणि आयसोलेशन बे बांधणे. समाविष्ट आहे. नवीन टर्मिनल इमारत ही चार हजार चौरस मीटर क्षेत्रात बांधली जात आहे आणि गर्दीच्या वेळी ३०० प्रवाशांना वाहण्यास सक्षम असेल. हे टर्मिनल दहा चेक-इन काउंटरसह सर्व आधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज असेल. ही इमारत शाश्वत वैशिष्ट्यांसह 'फोर-स्टार ग्रिहा-रेटेड' 'ऊर्जा-कार्यक्षम' इमारत असेल. “विमानतळाच्या नवीन जागतिक दर्जाच्या टर्मिनल इमारतीमुळे कोल्हापूरशी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि या भागातील पर्यटन उद्योगाला चालना मिळेल,” असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.
नवीन टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागावरील महाकाय तोरण हे कोल्हापूर शहरातील महाराजा पॅलेस, भवानी मंडप आणि पन्हाळा किल्ला या वारसा वास्तूंच्या स्थापत्यातूनप्रेरित असेल.कोल्हापूर विमानतळ उदान योजनेंतर्गत ओळखले गेले आहे. आणि सध्या हैदराबाद, बंगलोर, मुंबई आणि तिरुपतीशी जोडलेले आहे. अलीकडेच या विमानतळाला सात दिवस २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेले आहे. हे ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि पूर्वीच्या राजघराण्यांच्या शाही ठिकाणांसाठी ओळखले जाणारे शहर आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121