हिंदीसाठी मराठी सिनेमांचा बळी का!

    13-Aug-2022
Total Views | 68
 
 


sumit 
 
 
 
मुंबई : मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीमध्ये लोकप्रिय असलेला अभिनेता सुमित राघवन सोशल मिडीयावर राजकीय - सामाजिक विषयांवर आपली अनेक मते मांडत असतो. या सगळ्यात सुमितने लिहिलेली एक पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. नुकताच आमीर खानचा लालसिंह चढ्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आणि याचा परिणाम होतोय तो म्हणजे सुमित राघवनच्या 'एकदा काय झालं!!' या चित्रपटावर. या चित्रपटाला कुठेही थिएटर मिळत नाहीये. त्यामुळे सुमितने नाराजी व्यक्त करणारी एक पोस्ट लिहिली आहे.
 
 
 
सुमित राघवन आपल्या पोस्ट मध्ये म्हणतोय की, ''एकदा काय झालं!!' या चित्रपटावरच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, जिथे पिकते तिथे विकत नाही. आज आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला तरी त्याला थिएटर नाही! मुंबईमध्ये जेमतेम ३ शो त्याला मिळालेत, ठाण्याला एखादा आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याला थिएटरच नाही. या हिंदी सिनेमांसाठी आमचा बळी जातोय.'
 
 
 
 
 
 
 
 
तर या चित्रपटाचे संगीतकार सलील कुलकर्णी आणि अमित खोपकर यांनी थिएटर मिळत नाही म्हणून आश्चर्य व्यक्त केले आहे. हिंदीच्या बॉयकोटचा ट्रेंड सुरु असलेल्या चित्रपटांना 'रक्षाबंधन' आणि 'लालसिंह चढ्ढा' बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत आहेत पण मराठीवर अन्याय का! हा प्रकार थांबायला हवा. असे मत मराठी कलाकार व्यक्त करत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121