हिंदीसाठी मराठी सिनेमांचा बळी का!

    13-Aug-2022
Total Views |
 
 


sumit 
 
 
 
मुंबई : मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीमध्ये लोकप्रिय असलेला अभिनेता सुमित राघवन सोशल मिडीयावर राजकीय - सामाजिक विषयांवर आपली अनेक मते मांडत असतो. या सगळ्यात सुमितने लिहिलेली एक पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. नुकताच आमीर खानचा लालसिंह चढ्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आणि याचा परिणाम होतोय तो म्हणजे सुमित राघवनच्या 'एकदा काय झालं!!' या चित्रपटावर. या चित्रपटाला कुठेही थिएटर मिळत नाहीये. त्यामुळे सुमितने नाराजी व्यक्त करणारी एक पोस्ट लिहिली आहे.
 
 
 
सुमित राघवन आपल्या पोस्ट मध्ये म्हणतोय की, ''एकदा काय झालं!!' या चित्रपटावरच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, जिथे पिकते तिथे विकत नाही. आज आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला तरी त्याला थिएटर नाही! मुंबईमध्ये जेमतेम ३ शो त्याला मिळालेत, ठाण्याला एखादा आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याला थिएटरच नाही. या हिंदी सिनेमांसाठी आमचा बळी जातोय.'
 
 
 
 
 
 
 
 
तर या चित्रपटाचे संगीतकार सलील कुलकर्णी आणि अमित खोपकर यांनी थिएटर मिळत नाही म्हणून आश्चर्य व्यक्त केले आहे. हिंदीच्या बॉयकोटचा ट्रेंड सुरु असलेल्या चित्रपटांना 'रक्षाबंधन' आणि 'लालसिंह चढ्ढा' बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत आहेत पण मराठीवर अन्याय का! हा प्रकार थांबायला हवा. असे मत मराठी कलाकार व्यक्त करत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121