२०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र

पाटण्यात ‘दहशतवादी नेटवर्क’चा पर्दाफाश ‘पीएफआय’ आणि ‘एसडीपीआय’चाही संबंध

    15-Jul-2022
Total Views | 93

islami
 
 
 
पाटणा: २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र रचल्याचा खुलासा पाटण्यातून पर्दाफाश केलेल्या ‘दहशतवादी नेटवर्क’मधून उघड झाला आहे. पाटणा दौर्‍यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. त्यासाठी त्यांनी १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. नुपूर शर्मांसह इस्लामविरोधात बोलणार्‍यांची यादी या दहशतवाद्यांनी तयार केली होती. राजस्थानातील उदयपूर आणि महाराष्ट्रात अमरावतीत झालेल्या प्रकरणांसारखा बदला घेण्याची योजनादेखील या दहशतवाद्यांनी आखली होती. ‘एएसपी’ मनीष कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
 
 
पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या एक दिवस आधी पोलिसांनी अतहर परवेझ आणि मोहम्मद जलालुद्दीन या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. अतहरने पोलिसांना सांगितले की, “या मोहिमेत २६ जणांचा सहभाग होता व त्यांचे प्रशिक्षण पाटणा येथे सुरू होते. हे सर्व लोक ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘पीएफआय’ आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘एसडीपीआय’शी संबंधित होते.
 
 
दहशतवाद्यांकडून सापडलेल्या ‘इंडिया २०४७’ नावाच्या दस्तावेजातून ही बाब समोर आली आहे. पोलिसांना सात पानी कागदपत्र मिळाले आहे. त्यात संपूर्ण नियोजनाचा उल्लेख आहे. पाटण्यातील फुलवारी शरीफच्या ‘अहमद पॅलेस’च्या दुसर्‍या मजल्यावर प्रशिक्षण केंद्र बनवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये बिहारच्या बाहेरचे लोकही येत होते.
पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाटणा दौर्‍याच्या एक दिवस आधी, म्हणजे दि. ११जुलैच्या संध्याकाळी, ‘आयबी’ने दिलेल्या माहितीच्या आधारावरून नया टोला येथे छापा टाकला आणि अतहर आणि जलालुद्दीनला पकडले. त्याच्या बँक खात्यातून ८० लाखांहून अधिक व्यवहार झाले आहेत. २००१, २००३ आणि २०१३ मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये अतहरचा सहभाग असल्याची माहितीही मनीष कुमार यांनी दिली. याची खातरजमा पोलिसांनी केली आहे. दि. ६-७ जुलै रोजी बिहार, तामिळनाडू, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील तरुणांना ‘मार्शल आर्ट’च्या नावाखाली प्रशिक्षण देण्यात आले. २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट आखण्यात आला होता.
 
 
पोलिसांनी त्यांच्या अड्ड्यावरुन अनेक आक्षेपार्ह ‘बॅनर’, ‘पॅम्प्लेट’, व्हिडिओ आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. दि. ११ जुलैपासून दोघांची चौकशी सुरू होती. पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी दोघांनाही माध्यमांसमोर हजर केले. ‘एएसपी’ मनीष कुमार यांनी सांगितले की, “अतहरची वेगवेगळ्या बँकांमध्ये तीन खाती आहेत. त्यापैकी ८३ लाख रुपये जमा झाले आहेत. तिन्ही खाती गोठवली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.”
 
 
‘सिमी’च्या जुन्या सदस्यांना जोडून बनवल्या जात होत्या गुप्त संघटना
अटक करण्यात आलेला मोहम्मद जलालुद्दीन प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य आहे. आता तो ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा सक्रिय सदस्यदेखील आहेत. चौकशीदरम्यान, ‘सिमी’चे माजी सदस्य ’पीएफआय’शी जोडले जात असल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांना जोडून गुप्त संघटना तयार केली जात आहे. या गुप्त संघटनेला मोठे लक्ष्य देण्यात आले आहे.
 
 
निवृत्त पोलीस अधिकारीच दहशतवादी
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी झारखंड पोलिसांचा निवृत्त पोलीस अधिकारी जलालुद्दीन आणि त्याचा साथीदार अतहर परवेझ आहेत. या दोघांवर ‘मार्शल आर्ट’ आणि शारीरिक शिक्षण देण्याच्या नावाखाली शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. दोघांवरही धार्मिक कट्टरता पसरवल्याचा आणि दहशतवादी कारवाया केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121