जागतिक अन्नसंकटात झपाट्याने वाढ

    05-Jun-2022   
Total Views | 67
 
 
 
 
 
page 8
 
 
 
 
 
 
 
जगभरात ‘होम फूड’चा वाटा जगातील एकूण वाया जाणार्‍या अन्नापैकी ६१ टक्के आहे. एवढेच नव्हे तर दरवर्षी सहा दशलक्ष ग्लास दूध वाया जाते. ही चिंतेची बाब आहे. कारण, येत्या चार दशकांत जगातील ४०० दशलक्ष लोक उपासमारीच्या संकटाचा सामना करण्याची शक्यता जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या म्हणण्यानुसार, आज जगातील अन्नसंकट झपाट्याने गहिरे होत आहे. हीच स्थिती राहिल्यास २०५० पर्यंत जगभर अन्नासाठी संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
 
मानवी जीवनात अन्नधान्य अत्यावश्यक घटक आहे. अशा परिस्थितीत मानवता वाचवण्यासाठी पुरेशा प्रमाणात अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. पण अलीकडेच संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली की, सध्याच्या परिस्थितीत जगात फक्त ७० दिवसांचा अन्नसाठा शिल्लक आहे. अर्थात, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती भयावह झाली आहे. रशिया आणि युक्रेन मिळून जगाच्या एक चतुर्थांश धान्याचा पुरवठा करतात. पण रशियाच्या हल्ल्याने युक्रेनची यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे.
 
 
युक्रेनला त्याच्या अन्न उत्पादन क्षमतेमुळे युरोपची ‘ब्रेड बास्केट’ म्हटले जाते. गेल्या हंगामात रशियामध्ये गव्हाचे चांगले उत्पादन झाले, तर नैसर्गिक प्रकोपामुळे अमेरिका आणि युरोप या देशांमध्ये अन्नधान्य कमी आहे. या परिस्थितीमुळे जगाचे रशियावरील अवलंबित्व वाढले आहे. दुसरीकडे, भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने अशा परिस्थितीत ज्या देशांना भारताकडून अतिरिक्त मदतीची अपेक्षा होती, त्यांच्या चेहर्‍यावर निराशा आहे. तथापि, गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यामागे भारताची स्वतःची कारणे आहेत. कोणत्याही देशाच्या लोकशाही सरकारचे पहिले कर्तव्य म्हणजे तेथील नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे. शेजारील श्रीलंकेत निर्माण झालेले अन्नसंकट आणि जगातील अन्नधान्याचा वाढता तुटवडा लक्षात घेता भारत सरकारला प्रथम देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे, नक्कीच आवश्यक आहे. अशा परिस्थितीत गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालणे हा एक पर्याय होता.
 
अन्नाचे संकट कोणत्याही समाजाला कसे ग्रासून टाकू शकते, श्रीलंकेचे उदाहरण याचा पुरावा आहे. जिथे अन्नटंचाईने ग्रासलेल्या लोकांना हिंसक निदर्शनास भाग पाडले गेले. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार, जगात तयार होणार्‍या एकूण अन्नापैकी एक तृतीयांश अन्न अजूनही वाया जाते, हा कचरा एकतर थाळीत टाकल्या जाणार्‍या कचर्‍यामुळे होतो किंवा उरलेले अन्न फेकून किंवा खराब झाल्यामुळे होते. हे जितके अन्न खराब करते तितके दोन अब्ज लोकांचे पोट भरू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतात दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात धान्य, भाजीपाला आणि इतर अन्नपदार्थ वाया जातात की, त्या प्रमाणात बिहारसारख्या राज्याच्या लोकसंख्येची गरज वर्षभर पूर्ण करता येते. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या ‘पीक संशोधन युनिट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग’च्या अहवालानुसार, दरवर्षी सुमारे सहा दशलक्ष टन अन्नपदार्थ वाया जातात.
 
 
चीननंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा अन्नधान्य उत्पादक देश असूनही भारतातील अन्न वितरणाची परिस्थिती काही वेळा फारशी सुखावह नसते. त्यासाठी योग्य आणि पुरेशा यंत्रणेचा अभावही असतो. रशिया-युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य देशांतील अन्नधान्याचा पुरवठा नक्कीच ठप्प झाला आहे. एका ढोबळ अंदाजानुसार २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या एक हजार कोटींच्या पुढे जाईल. म्हणजेच २०१७ च्या आकडेवारीच्या तुलनेत २०५० मध्ये ७० टक्के अधिक अन्नाची गरज भासणार आहे, तर पृथ्वीवरून दरवर्षी ७५० दशलक्ष टन सुपीक माती नष्ट होत आहे. साहजिकच अर्थपूर्ण पर्याय लवकर सापडला नाही, तर संपूर्ण लोकसंख्येसाठी पुरेशा प्रमाणात अन्नधान्य उत्पादनाचे मोठे संकट उभे राहील.
 
 
जेव्हा लोकसंख्येचा एक मोठा भाग कचर्‍याच्या ढिगार्‍यातून अन्न शोधायला भाग पाडतो, तेव्हा अन्नाच्या एका धान्याचीही नासाडी हा संपूर्ण मानवतेविरुद्धचा मोठा गुन्हा असल्याचे दिसून येते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, जगातील सर्वाधिक वाया जाणारे अन्न रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये बनवले जात नाही, तर घरांमध्ये बनवले जाते. जगात वाया जाणार्‍या एकूण अन्नापैकी ६१ टक्के वाटा घरगुती अन्नाचा आहे. ही चिंतेची बाब आहे. कारण, येत्या चार दशकांत जगातील ४०० दशलक्ष लोक उपासमारीच्या संकटाचा सामना करण्याची शक्यता आहे. तेव्हा आपण सर्वांनीच आता सजग होण्याची वेळ आली आहे.
 
 
 
 
 
 

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ, या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत.

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ, या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ 16 जून रोजी पालघर जिल्हयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121