आधार क्रमांकाशी जोडावे लागणार मतदार ओळखपत्र

मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, बनवेगिरीला बसणार चाप

    20-Jun-2022
Total Views | 47

Adhar
 
 
 
 
 
नवी दिल्ली : मतदार ओळखपत्राला आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी कायदे मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानंतर आता मतदार ओळखपत्राला आधारशी जोडणे अत्यावश्यक झाले आहे. आधार क्रमांकाशी जोडल्यानंतर बनावट मतदार ओळखपत्र रद्द करण्यात येतील. निवडणूकविषयक सुधारणांच्या दिशेने सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे. याबाबत कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून माहिती दिली आहे.
 
 
 
रिजिजून म्हणाले की, “प्रत्येक मतदाराला सशक्त करण्याच्या दिशेने पाऊल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून निवडणूकविषयक प्रक्रियेत सुधारणांसाठी ऐतिहासिक पाऊल. भारतीय निवडणूक आयोगाशी विचारविमर्श केल्यानंतर भारत सरकारने निवडणूकविषयक कायदा (सुधारित) अधिनियम २०२१ अंतर्गत चार अधिसूचना जारी केल्या आहे. कायदे मंत्रालयाने निवडणूक आयोगाशी विचारविमर्श केल्यानंतर ’रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रुल्स-१९६०’ आणि ‘कंडक्ट ऑफ इलेक्शन रुल्स-१९६१’ मध्ये दुरुस्ती केली आहे.
 
 
 
याबाबत सरकारने नुकतीच चार अधिसूचना जारी केल्या आहेत. या चार अधिसूचना गेल्या वर्षाच्या अखेरीस संसदेत मंजुरी देण्यात आलेल्या निवडणूक कायदा (सुधारित) अधिनियम २०२१चा भाग आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर आता कोणतीही व्यक्ती दोन मतदार ओळखपत्र बाळगू शकणार नाही. सोबतच केंद्र सरकारने मतदार ओळखपत्राशी निगडित आणखी तीन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत.
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121