येत्या पाच दिवसात मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

    26-May-2022
Total Views |

rain
 
 
 
 
 
  
मुंबई : मुंबईतील भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी दि. २४ रोजी सकाळी, मुंबईच्या अनेक भागात हलक्या पावसाने हजेरी लावली.
 
 
 
बुधवारी दि. २५ रोजी शहरात उच्च आर्द्रतेची नोंद झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेनुसार दि. २५ रोजी सकाळी सापेक्ष आर्द्रता ७१ टक्के होती. आणि कुलाबा वेधशाळेनुसार ती ८७ टक्के होती. बुधवारी दि.२५ कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस होते. येत्या दोन दिवसांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात शहरात मोसमातील पहिल्या मान्सूनपूर्व पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. मुंबईत आठवडाभर ढगाळ आकाश पाहायला मिळेल. तसेच दि. २८ आणि दि. २९ मे रोजी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
 
 
अंदमान पर्यंत पोचलेला नैऋत्य मोसमी पाऊस अजून पुढे सरकलेला नाही. संपूर्ण राज्यात मान्सूनच्या वार्षिक तारखा १२ जून ते १५ जून या आहेत. यावेळीही मान्सून त्याच वेळी महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख १0 जून आहे.
 
 
 
 
 
  
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121