साई बांगोडातील अतिक्रमणावर मोठी कारवाई!

राखीव वनातील अनधिकृत बांधकामावर "जेसीबी" वन विभाग, पोलीस विभाग व राज्य राखीव पोलीस दल यांची संयुक्त कारवाई

    20-May-2022   
Total Views | 84
Sai
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी): संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील साई बांगोडा परिसरात शुक्रवार दि. २० रोजी वन विभागाच्या राखीव वनातील २५.50 हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमणावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. वन विभाग, पोलीस विभाग व राज्य राखीव पोलीस बल यांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली आहे. अवैध रित्या अतिक्रमण केलेल्या ठिकाणी भूमिगत दारूसाठा देखील सापडला आहे. दारू साठ्याच्या चार भूमिगत टाक्या नेस्तनाबूत करण्यात आल्या आहेत. 
 
Sai1 
 
 
गेल्या काही दिवसांपासून अनेक अतिक्रमण कर्त्यांकडून संघटीतरित्या या भागात जागा काबीज केल्याची बाब समोर आली होती. या अतिक्रमणाबाबत वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात 'स्पेशल लिव्ह पिटीशन' (सिव्हील) दाखल करण्यात आली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी काल दि. २० रोजी वन विभाग, पोलीस विभाग व राज्य राखीव पोलीस दलाचे ७०० कर्मचारी उपस्थित होते. या आधीच्या कारवाई दरम्यान अतिक्रमण कर्त्या महिला ढाल म्हणून पुढे उभ्या राहिल्या होत्या मात्र, या कारवाई दरम्यान महिला आणि पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जंगलातील लाकूड तोडून ते अवैध दारू भट्टी साठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. या संयुक्त कारवाईमध्ये उलटनपाडा, साई बांगोडा, मोरोशीपाडा येथील सुमारे २५.५० हे. क्षेत्रावरील शेतीसाठीचे आणि इतर अतिक्रमण पुर्णपणे काढून टाकण्यात आले आहे.
 
अतिक्रमण काढून टाकण्याच्या यशस्वी कारवाईनंतर साई बांगोडा परिसरातील मोकळ्या जागेवर पुन्हा नैसर्गिक वन्यजीव अधिवासाची निर्मिती करण्यात येणार आहे. या साठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना कार्यान्वीत करण्यात येतील असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
 
 

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास. 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121