महाराष्ट्रात 'आयसीस'च्या दहशतवाद्याला सोडले!

मुलांना शिकवण्याचे आणि वृद्धाश्रमात सेवा करण्याचे आदेश बाल न्याय मंडळाचा निर्णय

    19-May-2022
Total Views |
ISI

मुंबई(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील औरंगाबादमधील राज्याच्या बाल न्याय मंडळाने 'आयसीस'या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने आपल्या भागातील शाळकरी मुलांना शिकवण्याचे आदेश दिले आहेत.
अहवालानुसार, दहशतवादी प्रकरणात दोषी ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. तीन सदस्यीय बाल न्याय मंडळाच्या नेतृत्वाखालील प्रधान दंडाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत. या किशोरवयीन आरोपीने निरीक्षण गृहात दि. २३ जानेवारी २०१९ पासून तीन वर्षे घालवली आहेत. दि. ११ मे रोजी बाल न्याय मंडळाने आपल्या निर्णयात 'चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ द लॉ ' अंतर्गत दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपीच्य चांगल्या वर्तनाच्या आधारावर सोडण्यात आले आहे. त्याला पोलीस ठाण्यातील प्रोबेशन ऑफिसरच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. पुढील सहा महिने महिन्यातून दोनदा वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर सामाजिक कार्यात हातभार लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना त्यांच्या परिसरातील इयत्ता सातवी आणि नव्वीच्या मुलांना गणित आणि इंग्रजी शिकवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र एटीएसने २०१८ मध्ये अटक
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दोषीला त्याच्या इतर सदस्यांसह २७ डिसेंबर २०१८ रोजी अटक केली. त्यावेळी ते 17 वर्षांचे होते. प्रतिबंधित इस्लामिक दहशतवादी संघटना ISIS च्या संघटित मॉड्यूलचा भाग असल्याने त्याला अटक करण्यात आली होती. औरंगाबाद आणि मुंबईत दहशतवादी घटना घडवण्यासाठी 'उम्मत-ए-मोहम्मदिया' नावाची संघटना स्थापन करणाऱ्या दहशतवाद्यांना महाराष्ट्र एटीएसने अटक केल्याचे यावेळी सांगण्यात आले. ऑगस्ट २०१८ मध्ये,राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या औरंगाबाद युनिटने एका अल्पवयीन संशयितासह नऊ जणांना ताब्यात घेतले होते. या सगळ्यांवर आयसीसचा प्रभाव असल्याचा आणि दहशतवादी हल्ल्याची योजना आखल्याचा संशय होता. नऊआरोपी दहशतवादी संघटना इसिसच्या विचारसरणीने प्रेरित असल्याचा आरोप एटीएसने केला होता. त्यांनी काही विषारी पदार्थ आणि स्फोटकांचा वापर करून मुंबई, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला होता.
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121