मुंबईकडे उरला ८२ दिवसांचा पाणीसाठा

सात तलाव मिळून उरला २२.९९ टक्के साठा

    18-May-2022
Total Views | 59
rain
 
मुंबई(प्रतिनिधी): मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सात तलावांमध्ये सरासरीच्या २२.९९ टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे. सध्या मुंबई शहराला ८२ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. एकूण १४,४७,३६३ लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या तुलनेत ३,२१,८९१ दशलक्ष लिटर इतका साठा आहे.
 
 
मुंबईत पावसाळा व्हायला अजून वेळ आहे. बीएमसी दरवर्षी १  ऑक्टोबर रोजी तलावांमधील पाण्याच्या पातळीचा आढावा घेते. भातसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा आणि मोडक सागर येथून शहराला पाणी येते. तुळशी आणि विहार ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेले दोन तलाव आहेत. सात तलावांमधून मुंबईला दररोज सुमारे ३,८५0 दशलक्ष लिटर पाणी मिळते. गत वर्षी दि. १५ मे रोजी पाणीसाठा १८.२६ टक्के होता. पावसाळ्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या अखेरीस सात तलाव १०० टक्के भरले, तर शहरात वर्षभरात पाणीकपात होण्याची शक्यता नाही. ऑगस्ट २०२०  मध्ये, पावसाच्या कमतरतेमुळे तलावांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मुंबईला पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस अशी आशा आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121