टनेल लाँड्री कंत्राटातील अनियमिततेला महापालिका आयुक्तांची मूकसंमती ?

आ. अमित साटम यांनी लिहिलेल्या पत्रात इकबाल सिंह चहल यांच्यावर निशाणा संबंधितांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

    17-May-2022
Total Views | 41
 
1


 
 
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या टनेल लाँड्री कंत्राटातील अनियमिततेवरून भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे सरचिटणीस अमित साटम यांनी पुन्हा एकदा महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहिले असून कंत्राटातील अनियमिततेवर भाष्य केले आहे. महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी कंत्राटाच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची देखील मागणी केली आहे.
 

त्याच प्रमाणे जर संबंधित अधिकारी आणि व्यक्तींवर कारवाई झाली नाही तर आपण राजकीय दबावाला बळी पडत जनतेच्या पैशाची धुलाई सुरु असलेल्या कंत्राटाला आणि या प्रकाराला एकप्रकारे मूकसंमती देत आहात,' असा निशाणा देखील आ. अमित साटम यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर लगावला आहे. या संदर्भात आ. अमित साटम यांनी नुकतेच महापालिका आयुक्तांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी देखील २२ एप्रिल रोजी साटम यांनी आयुक्तांना पत्र लिहून हा प्रकार लक्षात आणून दिला होता.

 
आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात आमदार अमित साटम म्हणाले की, 'टनेल लाँड्री कंत्राटाच्या संदर्भात होत असलेल्या संशयास्पद व अनेक नियम धाब्यावर बसवून उघड उघड चाललेला भ्रष्ट कारभार निदर्शनास आणून दिला होता. परंतु ज्या पद्धतीने आपल्याकडून कोणताही थेट प्रतिसाद न मिळाता प्रमुख अभियंताच्या मार्फत अत्यंत चालाख व सारवासारव करणार उत्तर मिळाले. हे अतिशय धक्कादायक आहे.



जिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेच्या कराचा पैसा लागलेला आहे तिथे पारदर्शकतेचा अभाव व नियमांची पायमल्ली होत असेल तर आपल्यावरही कुणाचा तरी राजकीय दबाव आहे का? अशी शंका येतेय. सदरील कंत्राट फक्त टनेल लाँड्री बनविण्यासाठी नसून तर टक्केवारीसाठी आपले हात धुवून घेण्यासाठीच काढले आहे का ? मला मिळालेले प्रमुख अभियंत्याचे उत्तर निव्वळ धूळपेक करणारे आहेच परंतु या पत्राचा सर्व खटाटोप कंत्राटदाराला वाचविण्यासाठीच होता. यामुळे महापालिका प्रशासनाची टक्केवारीसाठी चाललेली केविलवाणी परिस्थिती व अवस्था जनतेसमोर ऊघडी पडली आहे.,' असे साटम यांनी म्हटले आहे.
 


 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121