"श्रीरामांशिवाय आमचे अस्तित्व नाही" : नानजीन अन्सारी

वाराणसीत मुस्लिम महिलांकडून रामनवमीचा उत्सव साजरा

    11-Apr-2022
Total Views | 130

ramnvami
वाराणसी : "श्रीराम हेच आमचे पूर्वज असून त्यांच्याशिवाय आमचे अस्तित्व काहीच नाही" अशा शब्दांत भावना व्यक्त करत वाराणसीत मुस्लिम महिलांनी रामनवमी उत्सव साजरा करत सामाजिक, धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवले. भारतातील ज्या ज्या प्रदेशांनी श्रीरामांना सोडून दिले त्यांची पुढे दुर्दशाच झाली अशी भावना मुस्लिम महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष नानजीन अन्सारी यांनी व्यक्त केली आहे.
 
 
७ मार्च २००६ साली संकटमोचन मंदिर आणि केंट स्टेशन परिसरात बॉम्बहल्ले झाले होते. त्यात पुष्कळ प्राणहानी झाली होती. तेव्हा सर्व नागरिकांनी एकत्र येऊन संकटमोचन मंदिरात हनुमान चालिसेचा पाठ केला होता. तेव्हापासून दरवर्षी मुस्लिम महिलांकडून रामनवमीनिमित्त आरती केली जाते. या प्रसंगी मुस्लिम महिलांनी उर्दूमध्ये रामाची आरती केली. तसेच विश्वशांतीसाठी प्रार्थनासुद्धा केली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
दृष्यमान शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे

दृष्यमान शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे

राज्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतेसोबतच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे तसेच गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला अधिक गतीमान करण्यासाठी शासनाने लोकसहभागावर भर दिला आहे. सार्वजनिक व घरगुतीस्तरावरील घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने करून व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. त्याचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत "कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू" या मोहिमेची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121