कोरोनाने निधन झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरी द्या

भाजप शिक्षक आघाडीची मागणी

    06-Mar-2022
Total Views | 86
                 
teachers
 
 
मुंबई: कोरोना महामारीच्या काळात अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी कित्येक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे कोरोनामुळे निधन झाले.कोरोनामुळे निधन झालेल्या अशा कुटुंबातील किमान एका वारसालाअनुकंपा तत्त्वावर  शासकीय सेवेत सामावून घ्यावे. जेणेकरून त्यांच्या कुटुंबीयांना जगण्याचा आधार मिळेल.
 
शासनाकडून स्थगित असलेली अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया तातडीने सुरू करून कोरोना काळात निधन पावलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या वारसांना तातडीने शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी करणारे निवेदन भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष डॉ. राजू धोंडिबा बंडगर यांनी मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना पाठवले. यावेळी भाजप शिक्षक आघाडी मुंबईचे सोपान मोरे, विरेंद्र नेवरेकर, संदीप खेडकर, उमेश जागडे, महेश खाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121