‘सरल पोर्टल’वरचे संचमान्यतेचे चुकीचे आदेशमागे घ्या : अनिल बोरनारे

शिक्षण विभागाच्या दि. 28 फेब्रुवारीच्या आदेशाने राज्यातील शेकडो शिक्षक अतिरिक्त होणार

    05-Mar-2022
Total Views | 93

news




मुंबई
: “ ‘सरल पोर्टल’ वरील नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर संचमान्यता करण्यात यावी, हे शासनाचे आदेश चुकीचे आहेत. हे आदेश तातडीने मागे घ्यावेत,” अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी नुकतीच शासनाकडे केली आहे.

या आदेशामुळे राज्यातील शेकडो शिक्षक-शिक्षकेत्तर अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळेत प्रत्यक्ष असलेल्या विद्यार्थी संख्येवर संचमान्यता करण्याची मागणीही अनिल बोरनारे यांनी केली आहे. याबाबत अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री, शिक्षण उपसचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना निवेदन पाठविले आहे.


‘सरल पोर्टल’वर विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करण्याबाबत गुरुवार, दि. 31 मार्चपर्यंत शाळांना मुदतवाढ दिली असून, दि. 31 मार्च अखेर विद्यार्थी नोंद असलेली विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून 2021-22 ची संचमान्यता करण्याचे आदेश शिक्षण उपसचिवांनी दि. 28 फेब्रुवारी रोजी शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.

अनेक विद्यार्थ्यांच्या नावात, आडनावात, जन्मतारखेत दुरुस्ती केल्यावरसुद्धा‘पोर्टल’वर विद्यार्थ्यांची नावे ‘अपडेट’ होत नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी संचमान्यतेमध्ये धरता येणार नाहीत. परिणामी, शिक्षक अतिरिक्त ठरतील. मागील दोन महिन्यांपासून शिक्षकांना या कामासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. नावांची दुरुस्ती, जन्मतारखेत बदल, या दुरुस्त्या करूनही ‘अपडेट’ होत नसल्याने अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी ‘पोर्टल’वर होत नाही.

राज्यात असे हजारो विद्यार्थी असल्याने व संचमान्यतेत हे विद्यार्थी धरले जात नसल्याने याचा गंभीर परिणाम शिक्षक अतिरिक्त ठरण्यावर होऊ शकतो. त्यामुळे या तांत्रिक बाबी लक्षात घेता दुरुस्ती केल्यावरसुद्धा ‘अपडेट’ न होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या संचमान्यतेत ग्राह्य धरण्याचे आदेश निर्गमित करून शिक्षकांवरील होणारा अन्याय तातडीने दूर करावा, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.







अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121