देवनार रस्त्याच्या उद्घाटनानंतर १३० कोटींचा फेरफार कशासाठी : प्रभाकर शिंदे

    03-Mar-2022
Total Views | 87

Prabhakar Shinde
 
मुंबई : “मुंबई पालिकेने बांधलेल्या देवनार रस्त्याचे उद्घाटन सहा महिन्यांपूर्वी झाले असताना या कामाच्या खर्चात तब्बल १३० कोटी रुपयांचा फेरफार कशासाठी झाला आहे,” असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बुधवार, दि. २ मार्च रोजी स्थायी समितीच्या सभेत केला. तिसर्‍यांदा फेरफार झाला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 
 
अद्याप पुलाचे नामकरण नाही
देवनारकडे जाणार्‍या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी आहे, कोणत्याही ट्रकना तसेच, दुचाकींनाही जाऊ देत नाहीत, पुलावरील पृष्ठाभाग खडबडीत आहे, त्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही. गेल्या सात महिन्यांपासून मी याचा पाठपुरावा करत असतानाही अद्याप या पुलाचे नामकरण झाले नाही, यालाही शिंदे यांनी यावेळी आक्षेप घेतला. “आपण सत्ताधारी आहात. महाराजांचे नाव देण्याकरीता महापौर आपल्या शब्दाबाहेर नाहीत,” असा टोला शिंदे यांनी लगावला.
 
 
“या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्वरित द्या, अशी मागणी करून या कामाच्या खर्चात तिसर्‍यांदा झालेल्या कोट्यवधी रुपयांचा फेरफार मंजूर न करता, प्रस्तावही संमत करू नये,” अशी मागणी काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी केली. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी पूलावरील होणार्‍या अपघातामुळे हा प्रस्ताव मंजूर करु नका, अशी मागणी केली.
 
 
फेरफार तांत्रिक असून, तो ‘जीएसटी’संबंधी
यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सभागृहाला माहिती दिली की, “या पुलाच्या कामांचा कार्यादेश २०१७ पासून दिला होता. पुलाच्या कामाचा दर्जा सुधारून, पादचारी पुलाचीही सुधारणा झाली आहे, पुलाच्या कामात असलेल्या त्रुटी सुधारल्या आहेत. हा फेरफार तांत्रिक असून, तो ‘जीएसटी’संबंधी आहे. या कामांवर लागू केलेला ‘जीएसटी’ राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत जाणार आहे. कंत्राटदाराने ‘जीएसटी’ भरला आहे,” असे कळल्यानंतर ‘जीएसटी’ आयुक्तांशी संपर्क साधून तो परत मागण्यात येईल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121