आणखी एक शिवसेना नेता कारवाईच्या फेऱ्यात ?

यशवंत जाधवांनंतर कुणाचा नंबर लागणार ?

    29-Mar-2022   
Total Views |
 
another shivsena leader
 
 
 
मुंबई : विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव यांच्यानंतर आता मुंबईतील आणखी एका शिवसेना खासदाराच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारवाईचा ससेमिरा मागे लागण्याची शक्यता असलेला तो खासदार ’मातोश्री’ आणि ठाकरे कुटुंबाच्या जवळचा समजला जात असून, त्याचे महापालिकेशीदेखील संबंध जुडले गेलेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ’त्या’ खासदारावर कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजर खिळल्या आहेत.
 
 
 
 
‘हद्द कर दी...‘
भाजपचे नेते आणि माजी खसदार किरीट सोमय्या यांनी सोमवार, दि. 28 मार्च रोजी, ‘’हद्द कर दी यशवंत जाधवांनी घोटाळा लपवण्यासाठी, वांद्रे ‘मातोश्री’ला वाचविण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव द्यावे. वाईट वाटते. 50 लाखांचे घड्याळ, दोन कोटी रोख जाधवांनी पोचपावती, बिलही घेतले असेल,” असे ट्विट केले आहे.
 
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
वटवृक्षाविरोधात निघाला फतवा, धर्मांधांनी चालवली करवत; हिंदूंमध्ये संतापाची लाट!

वटवृक्षाविरोधात निघाला फतवा, धर्मांधांनी चालवली करवत; हिंदूंमध्ये संतापाची लाट!

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यापासून बांगलादेश एका उन्मादाकडे वाटचाल करत आहे हे स्पष्ट आहे. इस्लामिक कट्टरपंथी लोक प्रत्येक विभागात, सामाजिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व गाजवू पाहतायत. सरकारी किंवा सामाजिक पातळीवर घेतलेल्या निर्णयांवर प्रभाव पाडणे हा त्यांचा शरिया अधिकार मानतात. हिंदूंची प्रतिके धर्मांधांना एकतर धोकादायक वाटतात किंवा त्यास हराम म्हणून संबोधतात. हिंदूंसाठी पवित्र असलेले वडाचे प्राचीन झाड 'शिर्क' म्हणून तोडल्याचे निदर्शनास आले आहे Islamists destroy ..

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीडीए प्रशासनाने पोलिस आणि इतर विभागांसह सोमवार, दि. ५ मे रोजी तैमूर नगर नाल्याभोवतीच्या अतिक्रमणांविरुद्ध मोठी कारवाई केली. नाल्याच्या नऊ मीटर परिसरात असलेल्या अनेक बेकायदेशीर इमारती आणि त्यांच्या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींनी नाल्याजवळील जमिनीवर अतिक्रमण केले होते. आतापर्यंत, बेकायदेशीरपणे बांधलेली १०० हून अधिक घरे आणि दुग्धशाळा पाडण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिस ..