'U' म्हणजे उद्धव आणि यू-टर्न!

सत्तेसाठी शिवसेनेने गहन टाकला स्वाभिमान : चंद्रकांत पाटील

    21-Mar-2022
Total Views | 108

Chandrakant Patil
मुंबई : काही दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी महाआघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एमआयएमशी युती फेटाळत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 'सत्तेसाठी शिवसेनेने स्वाभिमान गहाण टाकला?' असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
 
"कलम ३७० रद्द झाले तेव्हा आमच्यासोबत सेलिब्रेशन, आता काश्मीरमध्ये जाऊन शिवसैनिकांचे आंदोलन, हिंदुत्वातले जाज्वल्य सोडले, सोडला सगळा अभिमान, सत्तेसाठी गहाण टाकलात तुम्ही स्वाभिमान! अजूनही वेळ गेलेली नाही. आता एमआयएम सारख्यांशी युती करणार का?", असा सवाल भाजप चंद्रकांत पाटील त्यांनी उद्धव ठाकरेंना केला.
 
 
एमआयएमचा आघाडीचा प्रस्ताव फेटाळत उद्धव ठाकरे यांनी एमएमआय ही भाजपची बी टीम असून हा सरकार पाडण्यासाठी भाजपचा कट असल्याचे म्हटले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्त्युतर दिले. 'एमआयएमने मविआला आघाडीची ऑफर देणे हा भाजपाचा डाव असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पण एमआयएमने ज्यांना ही ऑफर दिली आहे, त्यांच्या मांडीला मांडी लावूनच सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळवले आहेत ना? ते कायम ठेवण्यासाठी तुम्ही कसे धडपड आहेत, सत्तेसाठी कोण लाचार आहे आणि कोण नाही, हेही जनतेला दिसते आहे', असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
 
पुढे त्यांनी म्हंटले की, "सत्तेसाठीही एमआयएमसोबत जाणार नाही, झोपेतही एमआयएमशी युती नाही, अशी टाळीची वाक्ये यापूर्वी कुठल्या पक्षांसाठी वापरली होती, ते जरा आठवा. तुम्ही टीका करत होता, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष तिथेच आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जात स्वतःला त्यांच्या दावणीला बांधून घेतले आहे," अशी टीका त्यांनी केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121