एमआयएम या पक्षाकडून महाविकास आघाडीला युतीसाठी खुली ऑफर

    19-Mar-2022
Total Views | 96

sharad pawar 2


मुंबई :
 ऑल इंडिया मजली-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला आम्ही युती करण्यास तयार आहोत अशी खुली ऑफर दिली आहे. यावरून महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.तसेच विरोधी पक्षांकडून यासंबंधांत महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे.


एमआयएमचे खासदार म्हणतत्व की महाविकास आघाडी हे तीन चाकी सरकार आहे. आमच्याबरोबर युती करा मग हे सरकार चारचाकी होऊन जाईल. या एमआयएमकडून आलेल्या ऑफरवर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की समविचारी पक्ष एकत्र आल्यास आनंदाची गोष्ट आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हंटले की " औरंगजेबासमोर आम्ही कधी गुडघे टेकणार नाही ". त्यांनी युतीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. याबाबतीत महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहे.


भाजपचे आमदार नितेश राणे म्हणतात की " वाह.. एमआयएमची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी..कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे..आता फक्त आयसिसचा प्रस्ताव येणे बाकी आहे..खरंच, करून दाखवलं!!"देवेंद्र फडणवीस म्हणतात की "आम्हाला ठरविण्यासाठी कितीही पक्ष एकत्र येऊदेत आम्हाला फरक पडत नाही !" महाविकास आघाडीतले नेते युतीचा प्रस्ताव स्वीकारतील का ? की धुडकावून लावतील ? याचे उत्तर लवकरच मिळेल.







 

अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121