टँकर माफियांविरोधात ठाणेकर एकटवले

    12-Mar-2022
Total Views | 71

WATER
 
 
ठाणे : घोडबंदर रोड परिसरातील गृहसंकुलांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत असतानाही त्यावर ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. उलट टँकर माफियांना पोसण्याचेच काम सत्ताधारी आणि प्रशासन करीत आहे. या टँकर माफियांविरोधात आ. संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. १२ मार्च रोजी घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील ‘मोम्मई माँ कृपा हॉल’मध्ये ‘पाणी एल्गार परिषदे’चे आयोजन केले आहे. या ‘एल्गार परिषदेत’ शेकडो सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे ठाणे शहर चिटणीस दत्ता घाडगे आणि उत्तर भारतीय सेलचे सचिव चंद्रम्मा चौहान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
 
ठाण्यातील घोडबंदर परिसरात पाणी व अन्य मूलभूत सुविधांची बोंब असतानाही ठाणे महापालिकेद्वारे नवीन बांधकामांना परवानग्या दिल्या जात असल्याने येथील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची बिले भरूनही पाणीटंचाईमुळे येथील गृहसंकुलांना लाखो रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च करावे लागत आहेत. याविरोधात घोडबंदर परिसरातील रहिवासी मधु नारायणन उन्नी व दत्ता घाडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश दुर्लक्षित केल्याबद्दल जानेवारीमध्ये ठाणे मनपा आयुक्तांना नोटीस बजावली होती.
 
तरीही, परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने पाण्यासाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्णय घोडबंदरवासीयांनी घेतला आहे. त्यानुसार, आ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘वॉर अगेंस्ट टँकर माफिया’ या लोक चळवळीच्या माध्यमातून घोडबंदर परिसरात ‘पाणी एल्गार परिषदां’चे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी पहिली ‘एल्गार परिषद’ मानपाडा प्राईड पार्क येथील सभागृहात होणार असून, या परिषदेत घोडबंदर भागातील रहिवासी आणि शेकडो सोसायट्यांचा सहभाग असणार असल्याची माहिती घाडगे यांनी दिली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..