चंदगडमधील व्याघ्र अधिवासाकडे दुर्लक्ष; वनात फेकला जातोय मृत कोंबड्यांचा कचरा

    26-Feb-2022
Total Views | 255
chandgad



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
कोल्हापूरच्या 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मधील तिलारी नगर घाटामध्ये राजरोसपणे मृत कोंबड्यांचे अवशेष टाकण्याचे काम होत आहे. यामुळे इथला वन्यजीव अधिवास संकटात सापडण्याची शक्यता आहे. या कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघाचा अधिवास आहे. अशा परिस्थितीत याठिकाणी मृत कोंबड्यांचे अवशेष टाकले गेल्यामुळे त्याव्दारे वन्यजीवांचा संसर्गाची बाधा होण्याची शक्यता आहे.

डिसेंबर, २०२० मध्ये राज्य सरकाराने २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील 'चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'ची घोषणा केली होती. याठिकाणी नोव्हेंबर, २०२१ मध्ये वाघाने रेड्याची शिकार केली होती. शिवाय तिथे वाघाच्या पायाची पदचिन्हे देखील सापडलेली. व्याघ्र अधिवास असूनही याठिकाणी वन्यजीव अधिवासाचे व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने होताना दिसत नाही. कारण, कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा भाग असणाऱ्या तिलारीच्या घाटात पोल्ट्रीसाठी वाहतूक करण्याऱ्या वाहनांकडून मृत कोबड्यांचे अवेशष टाकण्याचे काम होत आहे. शिनोळी तसेच आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येने तिलारीत येणाऱ्या या पोल्ट्रीच्या गाड्या रोज रात्री तिलारी घाट उतरुन गोवा आणि बेळगावकडे जातात. वाटेतल्या हाॅटेलमध्ये कोंबड्या पुरवल्या की मृत कोंबड्या व इतर कचरा हा घाटातच टाकतात.

ही बाब 'वर्ल्ड फाॅर नेचर'ने समोर आणली आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ मेलेल्या कोंबड्या आणि त्यांचे शरीरातील अवशेष घाटामध्ये पकडले. हा सर्व कचरा गाडीत पुन्हा भरुन तो नेण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने वन्यजीवांसाठी संरक्षित असणाऱ्या क्षेत्रात मृत प्राण्यांचे अवशेष टाकणे त्याठिकाणी अधिवास करणाऱ्या वन्यजीवांसाठी धोकादायक ठरु शकते. या मृत अवशेषांव्दारे वन्यजीवांमध्ये एखादा संसर्ग पसरण्याचीही भिती असते. याविषयी पाटणेचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवले यांनी सांगितले की, "या प्रकरणाची लेखी तक्रार आम्हाला प्राप्त झालेली नाही. मात्र, समाजमाध्यंमाव्दारे मिळालेल्या माहितीनुसार आम्ही या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. अशापद्धतीने कचरा टाकणाऱ्या लोकांचा आम्ही शोध घेत आहोत. तसेच त्याबाबत जनजागृती करणारे फलकही लवकरच घाट क्षेत्रात लावण्यात येणार आहेत."

अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121