10 मार्च रोजी भाजपच्या ‘बंपर’ विजयाची धुळवड!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

    20-Feb-2022
Total Views | 163
 
                       
naredra modi
                    
 
 
 
 
लखनऊ : “उत्तर प्रदेशमधील नागरिकांनी यंदाच्या वर्षी दोन वेळा धुळवड साजरी करण्याची तयारी केली आहे. यंदा १८ मार्च रोजी होणार्‍या धुलिवंदनाआधी भाजपच्या बंपर विजयाची धुळवड १० मार्च रोजी साजरी केली जाणार आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. २० फेब्रुवारी रोजी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील हरदोई येथील जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, “ज्यांनी उत्तरप्रदेशात तुष्टीकरणाचे राजकारण करत सण रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांना येथील जनता १० मार्च रोजी उत्तर देईल. होळीसारख्या पवित्र सणाचा हरदोईच्या पवित्र भूमीशी असलेला संबंध आपल्या सर्वांना माहित आहे. मात्र, असे असतानाही येथील नागरिकांना त्यांचे हक्काचे सण साजरे करण्यापासून रोखत काही जणांनी तुष्टीकरणाचे राजकारण केले. अशा राजकारण्यांना जनताच प्रत्युत्तर देईल. मला माहित आहे की, यावेळी उत्तर प्रदेशच्या लोकांनी दोनदा धुळवड खेळण्याची तयारी केली आहे. भाजपच्या बंपर विजयाची पहिली धुळवड १० मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. पण, १० मार्च रोजी धुळवड साजरी करायची असेल, तर त्याची तयारी आतापासूनच मतदान केंद्रावर, घरोघरी जाऊन करावी लागणार आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
 
अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा संदर्भ देत पंतप्रधानांचा हल्लाबोल
आपल्या भाषणात अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. अहमदाबादमध्ये दोन वेळा बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. सपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या सायकलमध्ये बॉम्ब ठेवत रुग्णालयात स्फोट घडवण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली होती, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. २०१३ मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तेव्हा या लोकांनी शमीम अहमद नावाच्या आरोपीवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता, असा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121