"झोपड्यांचे पुनर्वसन राज्याचा प्रश्न"

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे विधान

    18-Feb-2022
Total Views | 111
                    
slums
 
 
मुंबई: "मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांलगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे का हे राज्य सरकारचे आहे" असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी केले. "या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश पळून तसेच तसेच राज्यसरकारशी चर्चा केल्यानंतरच तोडगा काढला जाईल" असेही दानवे यांनी स्पष्ट केले. रेल्वे रुळांलगतच्या अनधिकृत झोपड्या हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशानंतर या झोपड्या हटवण्याचे काम सुरु आहे.
 
 
 
उपनगरीय रेल्वे रुळांलगतच्या अनधिकृत झोपड्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. या झोपड्यांमध्ये स्वयंपाकासाठी वापरले जाणारे गॅस, चुली यांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. येथे झालेली छोटीशी दुर्घटनासुद्धा लाखो प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते अशी भीती रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. या झोपड्या हटवण्यासाठी सुरु असलेल्या रेल्वेच्या कारवाईला स्थानिक राजकारण्यांकडून विरोध होतो आहे. याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आमदार- खासदार यांची दानवे यांच्या सोबत बैठक झाली. या बैठकीला दानवे यांच्यासह मुंबई आणि उपनगरांतील सगळे खासदार- आमदार उपस्थित होते. या परिषदेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अंधेरी तहसील कार्यालय : ‘लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु।’

अंधेरी तहसील कार्यालय : ‘लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु।’

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे जन्म त्रिशताब्दी वर्ष, तर संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष. या विशेष काळात मुंंबईतील अंधेरी तहसीलच्या कार्यालयाला भेट देण्याचा योग आला. प्रशासकीय कार्य गतिशील, पारदर्शक, सुकर आणि लोकाभिमुख व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याचे निर्देश दिले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर अंधेरी तहसीलचे प्रशासकीय चौकटीतले, पण लोकाभिमुख, संवेदनशील, कार्यक्षम स्वरूप अनुभवले. त्या प्रेरणादायी अनुभवाच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121