‘इसिस’प्रेरित दहशतवाद हे जगापुढील आव्हान : अजित डोवाल

इंडोनेशिया सोबतच्या शांतता परिषदेत प्रतिपादन

    30-Nov-2022
Total Views | 68

अजित डोवाल
 
 
नवी दिल्ली : “इस्लाममध्ये ‘जिहाद अफजल’ या प्रथेचा अर्थ कुणाच्याही भावना अथवा अहंकाराशी खेळणे नसून निरपराध नागरिकांचे हित जपणे असा आहे. मात्र, कट्टरपंथीयांनी सुरू केलेला दहशतवाद हा इस्लामविरोधीच आहे,” असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केले आहे.
 
 
 
 
राजधानी दिल्लीत मंगळवारी भारत आणि इंडोनेशिया यांच्यावतीने आयोजित ‘शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यामध्ये उलेमांची भूमिका’ या विषयावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करीत होते. याविषयी बोलताना डोवाल म्हणाले की, “दहशतवाद आणि फुटीरतावाद याचा फटका दोन्ही देशांना बसत आहे. त्यातून आपण बाहेर येणे गरजेचे आहे. सीमेपलीकडून सुरू असलेल्या ‘इसिस’ पुरस्कृत दहशतवादी कारवायांचे आव्हान पेलणे काळाची गरज आहे.
 
 
 
 
सर्वसामान्यांना विश्वासात घेऊन या कारवाया रोखणे आवश्यक आहे.” दहशतवादी विध्वंसक कारवाया केल्यानंतर सीरिया किंवा अफगणिस्तानात आश्रय घेत असल्याचेही ते म्हणाले. सहनशीलता, सौहार्द आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी उलेमा आणि त्यांच्या अनुयायांनी पुढाकार घेण्याची वेळ आली असून कट्टरपंथीयांचा दहशतवाद रोखण्यासाठी हाच परिणामकारक उपाय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
 
 
धर्माचा दुरुपयोग करणे, तसेच कट्टरपंथी आणि त्यांचा न्याय मिळविण्याचा मार्ग याचे समर्थन करता येणार नाही, त्याचबरोबर या मार्गांना अंत नसल्याचेही डोवाल यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केले. इस्लाममध्ये अशा प्रवृत्तींना स्थान नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “विरोधकांनी दहशवाद्यांच्या कृत्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करू नये,” असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.
 
 
 
 
मानवता, शांतता आणि सामंजस्य हाच खरा धर्मप्रसाराचा संदेश आजघडीला गरजेचा असून, तिच शिकवण पवित्र कुराणात असल्याचेही त्यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीला मारणे म्हणजेच मानवतेची हत्या करण्यासारखे असून, त्यास वाचविणे हीच खरी मानवता आहे. निरपराधांची हत्या करणे हे इस्लामविरोधात असल्याचे ठाम मत डोवाल यांनी यावेळी व्यक्त केले.
सीमापार आणि ‘इसिस’प्रेरित दहशतवाद हे मानवतेपुढील सर्वांत मोठे आव्हान आहे. सीरिया आणि अफगाणिस्तान हे दहशतवादाचे केंद्रस्थान बनले आहेत.
 
 
 
 
आशियामध्ये सुसंवाद आणि शांतता हे भारताचे ध्येय आहे. भारत आणि इंडोनेशियाचे संबंध शतकानुशतके जुने आहेत. चोल राजवटीच्या काळातही भारताचे इंडोनेशियाशी व्यापारी संबंध होते. दोन्ही देशांमध्ये पर्यटनाचेही संबंध आहेत. संपूर्ण भारतातून पर्यटक बाली येथे भेट देतात, तेथे भव्य असे हिंदू मंदिर देखील आहे. जगातील पहिला सर्वात मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया आहे, तर भारत तिसरा सर्वात मोठा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे. त्यामुळे दहशतवादाविरोधात दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज डोवाल यांनी व्यक्त केली.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121