एकही गाव कुठेही जाणार नाही, “बेळगाव, कारवार, निपाणीही परत मिळवू!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

    23-Nov-2022
Total Views | 98

Devendra Fadnavis





नागपूर :
सांगलीतील जत तालुक्यावर कर्नाटकातील सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने २०१२ साली ग्रामस्थांनी तसा ठराव केला होता. त्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य त्यांनी केले आहे. याला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, "४० गावांनी २०१२मध्ये या गावांनी आम्हाला पाणी मिळत नाही, असं म्हणून ठराव केला होता. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा कर्नाटक सरकारशी वाटाघाटी करुन आम्हाला ज्या ठिकाणी पाणी हवं तिथे देण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर म्हैसाळच्या सुधारित योजनेतून तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही मान्यता दिली होती. आता या योजनेला तत्काळ मान्यता देणार आहोत. आता पाणी तिथे पोहोचणार आहे."


"सीमावादाच्या प्रश्नावरील बैठकीत अत्यंत महत्वाचे निर्णय ठरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतललेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सीमावासीयांचे जे प्रश्न असतील ते सोडविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले असावे. पण एकही गाव महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही. सीमाभागातील बांधवांसोबत आपण आहोत. त्यांना आणखी योजना देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवारसहीत आपले जे सीमाभाग आहेत. ते मिळविण्याचा आपण पूर्णप्रयत्न करणार आहोत. ही लढाई शत्रूत्वाची नाही तर कायद्याची आहे.", असेही फडणवीस म्हणाले.





अग्रलेख
जरुर वाचा
फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात..., ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

"फक्त एक तास द्या वक्फ सुधारित कायद्यात...", ओवैसींच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने तोडले अकलेचे तारे

Imran Masood एमआयएमचे नेते असिदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी एका सभेतून केवळ १५ मिनिटे द्या आम्ही काय करतो पाहा, असे देश विघातक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता संसदेत नुकतेच वक्फ सुधारित कायद्याला मंजूरी देण्यात आली. त्याविरोधात मु्स्लिम समाज आंदोलन करत आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूदने वक्फ सुधारणा कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर एका तासात वक्फ कायद्यात बदल करणार असल्याची धमकी वजा इशारा दिले आहे. ते हैदराबादमध्ये १३ एप्रिल रोजी मुस्लिम मिल्ली काउन्सिल..

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे...

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121