प्रतापगडावर लवकरच उभारणार अफझलखान वधाचा पुतळा

    15-Nov-2022
Total Views | 44

अफझलखान
 
 
 
मुंबई : स्वराज्यावर चालून आलेल्या आक्रमणकारी अफझलखानच्या कबरीवरील अतिक्रमणावरून महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानच्या कबरीच्या आसपास असलेले मोठे अतिक्रमण काढण्याचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी फडणवीस शिंदे सरकारच्या माध्यमातून नुकतीच करण्यात आली होती. त्याला जोडूनच आता प्रतापगडावर येत्या काही दिवसांमध्ये अफझलखानाच्या वधाचा पुतळा उभारला जाणार हे स्पष्ट झाले आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात पर्यटन सचिवांना सूचना दिल्या आहेत.
 
 
लोढा यांनी याबाबत पर्यटन सचिवांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. 'प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज व अफजलखान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले होते. हा प्रसंग आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित करतो. छत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष असून त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा अर्थात शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी तसेच लाईट व साउंड शो सुरु करण्याबाबत "हिंदू एकता आंदोलन, सातारा" व इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली आहे. तेव्हा या संदर्भात तात्काळ प्रस्ताव मागवण्यात यावा,' असे आदेश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.
 
 
प्रतापगड आणि अतिक्रमणाचा वाद
 
 
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानच्या कबरीजवळ २५ वर्षांपूर्वी पासून अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण सुरु झाल्याचे बोलले जाते. तसेच काही असामाजिक तत्त्वांकडून 'अफझल खान मेमोरिअल ट्रस्ट' नामक संस्थेची स्थापन करुन या गैरप्रकाराला पाठबळ दिल्याचा आरोप केला जातो. काही कुख्यात अंडरवर्ल्ड गुन्हेगारांचा यात सहभाग असल्याचेही बोलले गेले. कबरीजवळ करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी न्यायालयाकडून देखील आदेश देण्यात आले होते. परंतु, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात या कामाला विरोध केला गेला. मात्र, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या अतिक्रमणाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीचा अवलंब करून नेस्तनाबूत करून दाखवले आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...