भारतभरातील कलावंतांचे मुंबईत कला दालन

    12-Nov-2022
Total Views | 81

wtc
 
 
 
 
मुंबई : मुंबईतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये कला महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात ३ हजारांहूनअधिक कलाकृती एकाच इमारतीत पाहता येणार आहेत. या सर्व कलाकृतून ३०० हुन अधिक कलाकारांनी बनवलेल्या आहेत. हा महोत्सव ११ नोव्हेम्बरपासून १३ नोव्हेम्बर पर्यंत चालणार असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली व इतर भागांतील सुमारे 300 समकालीन व प्रथितयश कलाकारांच्या वैविध्यपूर्ण कलाकृती पाहता येतील.
 
 
चित्रे, शिल्पकृती, म्युरल्स, संकल्पशिल्पे, मांडणीशिल्पे आदींचा समावेश आहे. तैलरंग, ऍक्रिलिक रंग, पेस्टल, पेन अँड इंक, मिक्स मिडीयम ह्या माध्यमातील चित्रे व संगमरवर, टेराकोटा, ब्रॉन्झ, मेटल, फायबर, काष्ठ, स्टोन व मिक्स मिडीयम मधील शिल्पकृती एकत्रितपणे पाहता येतील. या कलाकृती काही मूर्त स्वरूपात आहेत तर काहीअमुर्त आहेत, ऍबस्ट्रॅक्ट पैंटिंग्स सुद्धा पाहता येतील.
 
 
इतर नवोदित कलाकारांसोबतच अनेक जेष्ठांच्याही कलाकृती या भागात मांडून ठेवलेल्या आहेत. टी वैकुंठम, सुहास रॉय, रमेश गोरजाला, लालूप्रसाद शॉ, सीमा कोहली यासारख्या अनेक कलाकारांसोबत बऱ्याचशा गुणवंत नवोदित कलाकारांची चित्रे व शिल्पाकृती मांडण्यात आली आहेत. ह्या सर्व कलाकृती निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे, वास्तवदर्शी चित्रे, ऐतिहासिक परंपरा, वारसा व संस्कृतीविशेष दाखवणारी चित्रे, धार्मिक संकल्पनांवर आधारित पारंपारिक चित्रे,आधुनिक आणि अमूर्त जीवनातील वास्तव दर्शवणाऱ्या अनेक शिल्पाकृती ठेवण्यात आल्या आहेत. तैलरंग, जलरंग, ॲक्रिलिक, मिक्स मीडिया, चारकोल, फायबर, संगमरवरी खडक, धातू व इंक इत्यादी पदार्थ वापरून तयार केल्या आहेत.
 
 
भारतात विविध प्रांतात वेगवेगळी संस्कृती पाहायला मिळते. माणूस त्या त्या भागातील संस्कृती जपताना तिचेच प्रतिनिधित्व आपल्या अभिव्यक्तीतून करत असतो. संस्कृतीतून मिळणारी प्रतिभा त्याच्या कलेतून परावर्तित होते. या अशा संपूर्ण सुफळ भारताचे प्रतिनिधित्व जाणारे हजारो कलाप्रकार आपल्याला या एकाच इमारतीत पाहायला मिळणार आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'आयटीआयच्या' हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण ..

१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान

१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान

( Maharashtra State Rural Improvement Mission honored in 100day office improvement program ) १०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा सन्मान करण्यात आला. अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121