धारावीकरांना फक्त एक रुपयांत पणती बनवणं कसं शक्य होतं?

    25-Oct-2022   
Total Views | 131

kumbharwada
धारावीतला कुंभारवाडा आहे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक...
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात साधारण दोन चौरस किलोमीटरच्या अंतरात धारावी वसलेली आहे. या एवढ्या परिसरात जवळपास एक कोटी इतकी लोकसंख्या आहे. या गर्दीतही इथले हिंदू लोक मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करतात. धारावीतील कुंभारवाड्यात या दिवाळीची तयारी तर ४ महिने पूर्वीपासूनच केली जाते. घरातल्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण दिवे बनवण्याच्या कार्यात हिरीरीने भाग घेतात. प्रत्येकाने आपापली कामे वाटून घेतली असतात. संपूर्ण मुंबईला उजळून टाकण्यासाठी कुंभारवाडा कामाला लागलेला असतो.
रस्त्यांवर मांडलेली दुकानं आणि त्यातून वाट काढत गळ्यातून आत शिरलो की वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटतं.
सर्वत्र मातीचं बांधकाम, एकमेकांवर रचून ठेवलेली सारख्या आकाराची मातीची मडकी, वेगवेगळ्या आकारातली मातीची भांडी, एका कोपऱ्यात उपयोगशून्य झालेल्या मातीच्या वस्तू आणि खापऱ्यांचा ढीग. समोरच्या चिंचोळ्या गल्लीत अगदी चार फुटांत दाटीवाटीने बांधलेल्या विटांच्या भट्ट्या. घरात, अंगणात, अगदी दारातल्या उंबरठ्यावर सुद्धा जागा मिळेल तिथे बसून पणत्यांना रंग देणाऱ्या स्त्रिया दिसून येत होत्या. प्रत्येक दारासमोर एका खोलगट भांड्यात भिजवलेली माती दिसून येत होती. ही माती गुजरातवरून मागवली जाते. मोठ्या पसरट पाट्यावर ती मळून भिजवून ठेवली जाते. त्यानंतर काही घरात पारंपरिक पद्धतीने हाताने मळून मातीचा गोळा बनवला जातो तर घरी घरांतून विजेवर चालणारी माती मळून देणारी यंत्र दिसून येतात. या यंत्रांच्या वापरामुळे वेळेची बचत होते.
प्रत्येक माणूस साधारणपणे १०० ते २०० भांडी दिवसाला बनवतो. संपूर्ण घराची मिळून जवळपास १ हजार भांडी एका दिवसात तयार होतात. तयार झाल्यावर उन्हात सुकवून भट्टीतून पक्की करवून घेतली जातात. त्यानंतर रंगकाम करून विक्रीसाठी दुकानात ठेवली जातात. या धारावीच्या गल्ल्यांमधून केवढी तरी कलात्मक वृत्तीची माणसे दिसून येतात. याच निमुळत्या गल्ल्यांतून दर दिवसाला हजारो कलाकृती जन्म घेतात. लहान सहान, नेहेमीच्या वापरातल्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन येथे होते. खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत इथे पाहायला मिळतो.
 
 

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.
 
अग्रलेख
जरुर वाचा
१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली ..

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121