भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे प्रतिक म्हणजे अयोध्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अयोध्येचा दीपोत्सव हा तर राष्ट्रोत्सव – योगी आदित्यनाथ

    23-Oct-2022
Total Views | 61
modi


पंधरा लक्ष दिव्यांनी उजळली अयोध्यानगरी, नवा जागतिक विक्रम प्रस्थापित
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशात एकेकाळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावून भारताच्या समृद्ध वारशास संपविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आज अयोध्यानगरी ही भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या सुवर्णाध्यायाचे प्रतिक ठरत आहे; अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांच्या समृद्ध अध्यात्मिक वारशाचा गौरव अयोध्येतील शरयूतीरावर रविवारी केला.
 
 
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये दिवाळीत दिपोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला आहे. यंदाच्या वर्षी सहावा दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आदी उपस्थित होते.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम प्रभू रामलला यांचे दर्शन घेतले, त्यानंतर श्रीरामजन्मभूमीस्थळी साकारणाऱ्या भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीचा आढावा घेऊन श्रीराम राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, देशात एकेकाळी प्रभू श्रीराम, आमची देदीप्यमान संस्कृती याविषयी बोलणे टाळले जात असे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे भारताचा धार्मिक आणि सांस्कृतिक गौरव असलेली शहरे आपसूकच दुर्लक्षित होऊ लागली. मात्र, गेल्या आठ वर्षांमध्ये या गौरवस्थानांना पुनर्जिवित करण्याचे धोरण राबविण्यात आले. परिणाम आज अयोध्यानगरी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या सुवर्णाध्यायाचे प्रतिक ठरली आहे. अयोध्यानगरी आज दिव्यांनी दिव्य आणि भावनांनी भव्य अशी झाली आहे. सध्याच्या पिढीस त्रेतायुगातील प्रभू श्रीरामचंद्रांचे स्वागत करणारी अयोध्या पाहता आली नाही, मात्र आज भारताच्या अमृतकालातील ‘अमर अयोध्या’ बघण्याची संधी मिळत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.
 
 
 
पर्व आणि उत्सव हे भारतीय समाजाचा अविभाज्य भाग असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जेव्हा जेव्हा भारतीय समाज काहीतरी नवे करतो, त्या त्या वेळी समाजाने नवा उत्सव रचला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी हजारो वर्षांपूर्वी रावणरूपी अत्याचाराचा अंत केला होता आणि सदाचाराची स्थापना केली होती. त्याची आठवण म्हणून आज तेवणारे दिवे हे भारताचे आदर्श, मूल्य आणि दर्शनाचे उर्जापूंज आहेत. दिव्यांचा हा अध्यात्मिक प्रकाश भारताच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात साजरी होणारी यंदाच्या दिवाळीमध्ये भारतीयांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या संकल्पशक्तीस आत्मसात करण्याची गरज आहे. त्यामुळे साध्य होणारा सांस्कृतिक उत्कर्ष हा नवभारताचे प्रतिक ठरेल, असाही विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
 
  
अयोध्या १३५ कोटी भारतीयांचे प्रतिनिधीत्व करते – योगी आदित्यनाथ
 
 
देशात काही काळापूर्वी कुत्सित राजकारणासाठी अयोध्यानगरीस ओसाड बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ज्या अयोध्येमध्ये साक्षात प्रभू श्रीरामाचे वास्तव्य आहे; ती नेहमीच देदीप्यमान राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्षांपूर्वी अयोध्येमध्ये दीपोत्ववास प्रारंभ झाला, त्यानंतर दरवर्षी दीपोत्सवाने नवे विक्रम रचले असून आज अयोध्येचा ‘दीपोत्सव’ हा ‘राष्ट्रोत्सव’ झाला असल्याचे मत प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रभू श्रीरामाच्या आदर्शांना प्रमाण मानून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटचाल करत आहेत. त्यामुळेच आज अयोध्या हे आज १३५ कोटी भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्र बनले आहे. श्रीराम जन्मभूमीवर तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भव्य श्रीराम मंदिराची उभारणी होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांची इच्छाशक्ती अतिशय महत्त्वाची ठरल्याचेही प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.
 
 
कर्तव्यांच्या पालनाद्वारेच साकारणार रामराज्य
 
 
प्रभू श्रीरामचंद्र हे कर्तव्याचे सजीव स्वरुप असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारतीय संविधानाचया मूळ प्रतीवर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे चित्र आहे. याच घटनेने आपल्याला मुलभूत अधिकार प्रदान केले आहेत. म्हणजेच अधिकारांची शाश्वती आहे, त्यासोबतच श्रीरामांच्या रूपात कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे. त्यामुळे रामराज्य साकारायचे असल्याचे कर्तव्यांना विसरून चालणार नसल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
 
 

deep 
नवा विश्वविक्रम प्रस्थापित
 
 
अयोध्येच्या शरयूतीरावरी ‘राम की पैडी’ येथे घाटाच्या दोन्ही बाजुंवर डोळ्यांचे पारणे फेडणारा दीपोत्सव साजरा झाला. त्याचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाला, यावेळी तब्बल १५ लक्ष ७६ हजार दिवे तेवत होते. याद्वारे अयोध्येने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला असून त्याविषयीचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रदान करण्यात आले.
 
 
डोळ्यांचे पारणे फेडणारा लेझर शो, आतषबाजी आणि लतादिदींना आदरांजली
 
 
दीपोत्सवामध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारा लेझर शो आणि आतषबाजी आयोजित करण्यात आला होता. लेझर शोच्या माध्यमातून संगीताने सजलेली राम कथा सादर करण्यात आली. यानंतर लता मंगेशकर यांचे 'ठुमक चालत रामचंद्र' हे गीत सादर करून गानकोकीळेस श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर ‘रघुपती राघव राजाराम’ आणि गायक उदित नारायण यांच्या आवाजातील ‘मंगल भवन अमंगल हरी’ ही गीते सादर करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील मंत्रमुग्ध झाले होते.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...