मुंबईत नवे 11 हजार 647 कोरोनाबाधित

दोन रुग्णांचा मृत्यू

    12-Jan-2022   
Total Views | 66
 
corona
 
 
 
मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ माजवण्यास सुरुवात केली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा स्फोट होत होता. पण सोमवारी रुग्णसंख्येत कमतरता आल्यानंतर मंगळवार, दि. ११ जानेवारी रोजीही रुग्णसंख्या काहीशी कमी दिसून आली. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मुंबईत 11 हजार 647 नवे कोरोनाबाधित सापडल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला मिळाला आहे. तसेच मंगळवारी शहरात केवळ दोन जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
 
 
 
मुंबई महापालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी तब्बल 14 हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर कायम राहिला असून मंगळवारी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मुंबईतील नागरिकांची संख्या 16 हजार 413 झाली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीला २ ते ३ दिवसांपासून काहीसा ब्रेक लागण्याचे चित्र कमी होत असलेल्या आकडेवारीवरून दिसू लागले आहे.
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..