मुंबई विमानतळावरचा 'तो' अपघात टळला.

    10-Jan-2022
Total Views | 90

Mumbai Airport
 
 
 
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक मोठा अपघात होता होता टळला. एअर इंडिया विमानाच्या पुश बॅक ट्रॉलीला दुपारी अचानक आग लागली. हे विमान मुंबईहून जामनगरला जाणार होते. यावेळी विमानात ८५ प्रवासी होते. या आगीमुळे विमान आणि प्रवाशांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. विमानतळावर उपस्थित असणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
 
 
 
 
 
काय आहे पुश बॅक ट्रॉली?
पुश बॅक ट्रॉली हा मुळात एक ट्रॅक्टर आहे. या ट्रॉलीला आणि विमानाच्या पुढच्या चाकाला एक रॉड जोडलेला असतो. याच्या सहाय्याने विमानाला धावपट्टीवर आणले जाते. त्यानंतर ट्रॉली काढली जाते आणि विमान टेक ऑफसाठी तयार केले जाते.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121