साकीनाका बलात्कार : चाय-बिस्कुट पत्रकारांकडून एकही प्रतिक्रीया नसावी!

"प्रसन्न जोशी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल काय वाटतं?"

    11-Sep-2021
Total Views | 1102

Prasanna Joshi _1 &n
 
मुंबई : अंधेरीतील साकिनाका बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मात्र, या प्रकरणाबद्दल महाविकास आघाडीतील महिला नेत्या, कार्यकर्त्या चिडीचूप आहेत. दरम्यान, सतत प्रत्येक गोष्टींवर बारीक 'लक्ष्य' ठेवणाऱ्या पत्रकार प्रसन्न जोशी यांना लेखिका शेफाली वैद्य यांनी एक टोला लगावला आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणावर तुम्ही काही बोलणार आहात का, असा प्रश्न त्यांनी जोशी यांना विचारला आहे.


लेखिका शेफाली वैद्य म्हणाल्या, "प्रसन्न जोशी, पुण्यात १४ वर्षाच्या मुलीवर १३ नराधमांनी बलात्कार केले, सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला गेला, मुंबईत साक़ीनाका येथे २७ वर्षाच्या महिलाचा बलात्कार आणि खून झाला. चाय-बिस्किट पत्रकारांकडून एकही प्रतिक्रिया नसावी हे गृहीतच! पण तुम्हाला महाराष्ट्राबद्दल काय वाटतं?"





हाथरस बलात्कार प्रकरणी दिली होती प्रतिक्रीया
"हे योगी...ज्या महाराजांचं नाव तुम्ही परवा घेत होतात, त्यांचा आदर्श गिरवाल, अशी अपेक्षा आहे! बाकी, भक्तांकडून एकही प्रतिक्रिया नसावी हे गृहीतच! कंगनाला, तेजस्वी सूर्याला उत्तर प्रदेशबद्दल काय वाटतं ते जाणून घ्यायला आवडेल...", असा प्रश्न त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हाथरस बलात्कार प्रकरणी २९ सप्टेंबर २०२० रोजी विचारला होता. नेमकं त्याच ट्विटला प्रत्युत्तर देत शेफाली वैद्य यांनी प्रश्न विचारला आहे.
राज्याला गृहमंत्री आहेत का ?
मुंबई आणि पुणे ही दोन शहरे राहण्याच्या दृष्टीने सुरक्षित मानली जातात. आज काय परिस्थिती आहे? पुण्यात सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याला पळवून नेण्यात आले, पुण्यात १४ वर्षीय महिलेला १३ जणांनी पळवले. साकीनाका, मुंबईत २७ वर्षीय महिलेची हत्या आणि हत्या. सर्व गेल्या तीन दिवसात घडल्या. महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत का?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

भारताचा आर्थिक कायापालट : निर्णायक नेतृत्वाने घडवलेले नवे पर्व

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (खचऋ) एप्रिल 2025च्या ताज्या अहवालाने प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची आणि आत्मविश्वासाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली आहे. या अहवालानुसार, भारताने 4.187 ट्रिलियन डॉलर्सच्या सकल राष्ट्रीय उत्पादनासह (ॠऊझ) जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थेला मागे टाकत, आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले नाव कोरले आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे, केवळ आकड्यांचा खेळ नसून, ते एका दूरदर्शी नेतृत्वाने, दृढ राजकीय इच्छाशक्तीने आणि सव्वाशे कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांनी गेल्या दशकात ..

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121