तालीबानबद्दल युएनची नरमाईची भूमिका ?

तालीबान बद्दल युएनची नरमाईची भूमिका ?

    29-Aug-2021
Total Views | 69

1 _1  H x W: 0


नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) काबुल एयरपोर्टवर झालेल्या बॉम्ब हल्ल्या प्रकरणी आपली भूमिका जाहीर केली आहे. याबद्दल जाहीर केलेल्या एका परिपत्रकातून तालीबानचे नाव हटविण्यात आले आहे. ज्यावेळी काबूलवर तालीबानने कब्जा केला त्यानंतर आता युएनची भूमिका बदलत आहे. यापूर्वी केलेले विधान आणि आत्ताचे विधान यात तफावत आढळल्याने युएनच्या भूमिकेवरच आता साशंकता व्यक्त केली जात आहे.

तालीबान्यांनी काबूल विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर जाहीर केलेल्या सुरक्षा परिषदेत चेतावनी दिली होती. तालीबान्यांनी इतर देशांतील दहशतवाद्यांशी कुठलेही संबंध ठेवू नयेत, असा इशारा देण्यात आला होता. आता नव्या विधानात तालीबानचे नावच हटवून टाकले आहे. त्याऐवजी असे म्हटले आहे की, कुठल्याही अफगाणी समुहाने देशात दहशतवाद पसरवणाऱ्यांशी सहकार्य करू नये, असे म्हटले आहे.


या वक्तव्यावर भारतातर्फेही स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारत १ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदावर आहे. गेल्या वर्षी एप्रिलपर्यंत संयुक्त राष्ट्र संघांचे प्रतिनिधी असलेल्या सय्यद अकबरुद्दीन यांनी युएन परिषदेच्या तफावत असलेल्या विधानावर बोट ठेवले आहे. १९ ऑगस्ट रोजी जेव्हा भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, "आम्ही सध्या तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत."


भारताने काबुलहून आपल्या मिशन स्टाफला पहिल्यांदाच बाहेर आणले. गेल्या आठवड्यात तालिबानी अफगानिस्तानातील भारतीय दूतावासात घुसले होते. त्यानंतर त्यांना मिळालेली कागदपत्रे घेऊन पार्कींगमध्ये घेऊन गेले होते. याबद्दल सरकारी सुत्रांनी चिंता व्यक्त केली होती.


अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121