९०च्या दशकात भारतीयांना भुरळ पाडणाऱ्या 'या' खेळाडूची मृत्यूशी झुंज

    10-Aug-2021
Total Views | 345

Chris_1  H x W:
 
 
 
मुंबई : ९०च्या दशकात एकेकाळी भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्तम खेळाडू असलेल्या सचिन, सेहवाग, गांगुली आणि द्रविड सारख्या फलंदाजांना हैराण करणाऱ्या न्यूझीलंडचा माजी खेळाडू मृत्यूशी झुंज देत आहे. न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिस केर्न्स याची प्रकृती चिंताजनक आहे. ऑस्ट्रेलियातल्या रुग्णालयामध्ये केर्न्स लाईफ सपोर्ट सिस्टीमवर असल्याची माहिती माध्यमांनी दिली.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षांच्या क्रिस केर्न्सवर आतापर्यंत अनेक शस्त्रक्रीय झाल्या असून त्याची प्रकृती मागील काही काळापासून चिंतेचा विषय राहिली आहे. ख्रिसला हृदयासंदर्भातील आरोग्य समस्या असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आल्या. मात्र या शस्त्रक्रीयांना त्याच्या शरीराने म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने दिवसोंदिवस त्याची प्रकृती खालावत गेली. यानंतर त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे.
 
 
 
न्यूझीलंडच्या क्रिस केर्न्स या अष्टपैलू खेळाडूने ६२ कसोटी आणि २१५ एकदिवसीय खेळल्या. २०००मध्ये विस्डनने केर्न्सची वर्षाच्या सर्वोत्तम ५ खेळाडूंमध्ये निवड केली. २००४ साली २०० विकेट आणि ३ हजारहून अधिक धावा करणारा तो जगातला सहावा खेळाडू ठरला होता. १९८९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या केर्न्सने ६२ कसोटीमध्ये ३,३२० धावा आणि २१५ एकदिवसीयमध्ये ४,९५० धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केर्न्सच्या नावावर ९ शतके आणि ४८ अर्धशतकेही आहेत.
 
 
 
निवृत्त झाल्यानंतर क्रिस केर्न्सवर संघाच्या इतर खेळाडूंनी फिक्सिंगचे आरोप केले होते. यामध्ये लू विन्सेंट याचा समावेश होता. लू विन्सेंट स्वत: मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. केर्न्सने आपल्याला फिक्सिंगची ऑफर दिली होती, असा आरोप विन्सेंटने केला होता. पण हे आरोप कधीही सिद्ध होऊ शकले नाहीत. मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर केर्न्सची आर्थिक स्थिती खराब झाली. घर चालवण्यासाठी त्याला ऑकलंड नगरपालिकेचे ट्रक चालवावे लागले, तसंच बस धुणे आणि बारमध्येही काम करावं लागलं.
 
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121