कोकणच्या हाकेला रा. स्व. संघ धावला

    27-Jul-2021
Total Views | 73

RSS kokan _1  H



ठाण्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीची रसद


ठाणे : अतिवृष्टी आणि दरडींच्या आपत्तीने पिचून गेलेल्या कोकणच्या हाकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाणे शाखेच्या स्वयंसेवकांनी घरोघरी फिरून गोळा केलेली मदतीची रसद कोकणातील पूरग्रस्तांसाठी रवाना केली. ठाण्यासह मुंबई व इतरत्र भागात रा. स्व. संघ व जनकल्याण समितीतर्फे मदतीचा हा ओघ सुरूच आहे.


आपत्तीत सहकार्यासाठी वेळ न घालवता यथाशक्ती धावून जाणे, हा सामान्य स्वयंसेवकाचा स्वभाव आहे. चरखी दादरी असो की, देशाच्या कुठल्याही भागात माणूस संकटात आहे हे कळताच संवेदनशील स्वयंसेवक तत्काळ सक्रिय होऊन थेट कृती करतो. समाजाला आवाहन करतो आणि समाजही मोठ्या विश्वासाने उत्स्फूर्त प्रतिसाद देतो.

कोकणातील पूरग्रस्त बांधवांसाठी रा. स्व. संघ ठाणेतर्फे मदतीचे आवाहन करताच अन्नधान्य, कपडे, वस्तू, अन्य आवश्यक साहित्य आणि धनादेश स्वरूपात मदतीचा अक्षरशः पाऊस पडला. नौपाडा परिसरातील संघाच्या प्रताप कार्यालयात परिसरातील महाविद्यालयीन तरुणाईने घरोघरी संपर्क करून साहित्याचे संकलन केले.


गोळा झालेल्या साहित्याची नोंदणी, वर्गवारी आणि बांधणी करून दोन टेम्पो आणि काही स्वयंसेवक पूरग्रस्त कोकणात रवाना करण्यात आल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले. आपल्या समाज बांधवांच्या वेदनेवर आपुलकी आणि कर्तव्य भावनेने फुंकर घालण्यासाठी पुढाकार घेणे, हीच आपल्या देशाची शक्ती आहे. रा. स्व. संघ 1925पासून या शक्तीचे संघटन करून रचनात्मक कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121