समान नागरी कायदा प्रत्यक्षात यावा!दिल्ली उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

    10-Jul-2021
Total Views | 64

delhi high court_1 &


नवी दिल्ली : एकसंध होत असलेल्या आधुनिक भारतीय समाजात आता धर्म, समुदाय आणि जातीचे पारंपरिक अडथळे दूर होत आहेत. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या ‘कलम ४४’ मध्ये नमूद केलेला समान नागरी कायदा आता प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे, अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतीच एका सुनावणीदरम्यान केली.


दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी एका खटल्याच्या सुनावणीवेळी ही महत्त्वाची टिप्पणी केली. यामुळे समान नागरी कायद्याची वाटचाल सुकर होण्याची शक्यता आहे. न्या. सिंह म्हणाल्या, “हळूहळू एकसंध होत असलेल्या आधुनिक भारतीय समाजामध्ये आता धर्म, समुदाय आणि जात यांची पारंपरिक बंधने आणि अडथळे नाहीसे होण्यास प्रारंभ झाला आहे. विविध धर्म, समुदाय, जाती, जमातींच्या तरुण वर्गाने हे सर्व अडथळे झुगारून देऊन विवाहदेखील केले आहेत. मात्र, त्यांना वेगवेगळ्या वैयक्तिक कायद्यांमुळे विवाह आणि घटस्फोटामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत. त्यांना अशाप्रकारे जबरदस्तीने अडथळे यायला नकोत. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या ‘कलम ४४’ मध्ये नमूद केलेली समान नागरी कायद्याची तरतूद केवळ आशा बनून राहू नये, तर ती प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे,” असेही न्या. सिंह यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे याविषयी केंद्र सरकारने गांभिर्याने विचार करावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.


न्या. सिंह एका घटस्फोटाच्या खटल्यावर सुनावणी करीत होत्या, त्यावेळी उभ्या राहिलेल्या कायदेशीर पेचाविषयी बोलताना त्यांनी समान नागरी कायद्याची गरज व्यक्त केली. याचिकाकर्त्या पती-पत्नींचा विवाह २०१२ साली हिंदू प्रथा आणि परंपरेप्रमाणे झाला होता. पतीने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांची राजस्थानातील मीना जमाती अनुसूचित नसल्याने हिंदू विवाह कायदा लागू होत नाही. सबब घटस्फोटाची याचिका फेटाळण्यात यावी, अशी विनंती पत्नीने न्यायालयात केली होती.
 
 


अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121