WTC Final : गोलंदाजांमुळे भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा बळावल्या !

    22-Jun-2021
Total Views | 65

Team_1  H x W:
 
 
मुंबई : गेले काही दिवस सुरु असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याचा थरार अद्याप संपलेला नाही. ५ दिवसांव्यतिरिक्त ६ वा दिवस आरक्षित असून आणखीन एक दिवस खेळण्यास मिळत असला तरीही हा सामना अनिर्णीत राहून भारत आणि न्यूझीलंड हा चषक शेअर करू शकतात, असे अंदाज बांधले जात आहेत. अशी चर्चा असताना भारतीय गोलंदाजांनी किवीच्या फलंदाजांसमोर टिचून गोलंदाजी सुरु ठेवली आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी किवींची अवस्था ५ बाद १३५ अशी करून ठेवली होती. कर्णधार केन विलीयन्सन वगळता इतर सर्व महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडण्यात भारतीयांना यश मिळाले आहे.
 
 
पाचव्या दिवशी भारतीय संघ विकेट मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होता. मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे दोघेही चांगली गोलंदाजी करत होते. न्यूझीलंडच्या डावातील ६३व्या षटकात मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर अनुभवी रॉस टेलरला बाद आणि केन - टेलरची भागीदारी मोडली. त्यानंतर इशांतने हेन्री निकोलस आणि शमीने बीजे वॅटलिंगला माघारी धाडत किवींचा कणा मोडला. गेले ४ दिवस पावसामुळे येणाऱ्या व्यत्ययाने वैतागलेल्या भारतीय क्रिकेटप्रेमींना अखेर गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे एक मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळाला आहे. त्यामुळे आता इथून भारतीय संघ सामना जिंकत इतिहास रचतो का? कि किवी सामना अनिर्णीत ठेवण्यात यशस्वी होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121