युरेनियम' प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास

    08-May-2021
Total Views | 81


arrest_1  H x W





मुंबई : मुंबई एटीएसकडून करण्यात आलेल्या कारवाईत 2 आरोपींना अटक करत 7 किलो युरेनियम जप्त करण्यात आले होते. यानंतर या संदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. यासाठी मुंबई एटीएसकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची प्रत राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात आलेली आहे.
 
 
मुंबईतील शिवाजीनगर परिसरामध्ये भंगारचा व्यवसाय करणाऱ्या अबू तहीर चौधरी या आरोपीला एटीएसने अटक केली आहे. या आरोपीच्या चौकशीनंतर जिगर पांड्या या आरोपीला एटीएसने अटक केली. न्यायालयाने आरोपींना हजर केले असता त्यांची रवानगी 12 मे पर्यंत एटीएस कोठडीत करण्यात आलेली आहे.
 
 
तब्बल 25 कोटी रुपयांचा 7 किलो युरेनियम विकण्याचा प्रयत्न जिगर पांड्या याच्याकडून केला जात असताना याबद्दलची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर त्यांनी या संदर्भात तपास करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला बनावट ग्राहक बनून 1 लाख रुपयात या आरोपींकडून काही प्रमाणात युरेनियम एटीएसच्या अधिकाऱ्यांनी मिळवले होते. त्याची तपासणी करण्यासाठी सदरचे युरेनियम भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर येथे पाठवण्यात आले होते. बीएआरसी येथे मिळालेल्या अहवालानंतर हे युरेनियम असून अतिशय घातक असल्याचं समोर आल्यानंतर एटीएसने या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121