सेंट्रल व्हिस्टा ‘राष्ट्रीय महत्वाचा’ प्रकल्प – दिल्ली उच्च न्यायालय

    31-May-2021
Total Views | 308
cv_1  H x W: 0



स्थगिती याचिका फेटाळली
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प हा ‘राष्ट्रीय महत्वाचा’ प्रकल्प आहे, त्याविषयी देशातील जनताही उत्सुक आहे, असे सांगून दिल्ली उच्च न्यायालयाने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प स्थगिती याचिका सोमवारी फेटाळून लावली. विशिष्ट हेतूने सदर जनहित याचिका असल्याचे निरिक्षण नोंदवित याचिकाकर्त्यास १ लाख रूपयांचा दंडही ठोठावला.
 
 
 
केंद्र सरकारने सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला असून त्याअंतर्गत संसदेची नवी वास्तू, केंद्र सरकारच्या विभागांसाठी नवी कार्यालये आणि राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटदरम्यानच्या राजपथाचा विकास केला जाणार आहे. करोना संसर्गाच्या काळात सदर प्रकल्प स्थगित करण्याचे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका अन्या मल्होत्रा आणि सोहेल हाशमी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. डि. एन. पटेल आणि न्या. ज्योती सिंग यांच्या खंडपीठाने सदर याचिका फेटाळून लावली.
 
 
 
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प हा राष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प आहे, जनतेचीही त्याविषयी उत्सुकता आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर, २०२१ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. सदर बांधकामावर काम करणारे कामगार तेथेच वास्तव्यास आहेत, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे करोना संसर्गाची काळजी घेण्याविषयीचीही आवश्यक त्या नियमावलीचे पालन केले जात आहे. त्यामुळे सदर प्रकल्पास स्थगिती देण्याचे कोणतेही कारण नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 
 
 
 
यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांवरही ताशेरे ओढले. सदर जनहित याचिका ही खरोखरच जनहितासाठी दाखल करण्यात आली नसून प्रकल्प बंद करण्यासाठीच ती दाखल करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे याचिकाकर्त्यांना १ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात येत असल्याचेही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कराची हल्ल्याचे वास्तव काय? कराची पोर्ट ट्रस्ट ऑफिशिअलचे सूचक ट्विट!

कराची हल्ल्याचे वास्तव काय? कराची पोर्ट ट्रस्ट ऑफिशिअलचे सूचक ट्विट!

जम्मू आणि काश्मिरच्या कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये निरपराध नागरिकाना लक्ष्य केल्यामुळे पाकिस्तानने स्वतःला अडचणीत आणले आहे. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईबाबत पाकिस्तान सरकारने अपेक्षाही केली नसेल. यावेळी १०० नाही तर थेट ३०० किलोमीटरच्या आत असलेल्या बहुतेक महत्त्वाच्या ठिकाणांवर भारताकडून मोठे हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, भारतीय नौदलाच्या युद्धनौके आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात करण्यात आले असून कराची ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121