महाराष्ट्र पोलीस दलाच्या C-60 कमांडोंनी ठार केले १३ नक्षली

    21-May-2021
Total Views | 191

ANI _1  H x W:
 
गडचिरोली : महाराष्ट्र पोलीस दलातील C-60 कमांडो पथकाने १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून आत्तापर्यंत सहा मृतदेह हाती लागले आहेत. एट्टापल्ली तालुक्यातील पैदी कोटमी जंगलात ही चकमक झाली. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी संदर्भातील माहिती दिली आहे.
 
 
 
शुक्रवारी सकाळपासूनच नक्षलविरोधी अभियान राबवण्यात आले आहे. या ठिकाणी नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू होते. नेमकी याच ठिकाणी पोलीसांची तुकडी पोहचली. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत १३ नक्षली ठार झाले.
चकमक उशीरापर्यंत सुरू होती, असे सांगण्यात आले.
 
 
 
त्यावेळी सहा मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. अधीक्षक गोयल म्हणाले, "एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत याची माहिती मोहिम संपल्यावरच हाती येणार आहे. कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले. तेंदू हंगाम सुरू असल्याने नक्षली तेंदू कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करतात. याच नियोजनाची बैठक सुरू होती, ही माहिती पोलीसांना मिळाल्यावर अभियान सुरू केली.
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121