आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा- किरीट सोमय्या

    23-Apr-2021
Total Views | 61


rajesh_1  H x W


 

मुंबई : नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 23 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच, विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील सगळ्या हॉस्पिटलचे फायर ऑडिट त्वरित करा व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपला राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.

नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 23 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच, विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये १३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले व इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

विरार मधील हॉस्पिटलला आग लागून मृत्यू झालेल्या प्रकरणासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा तांडव सुरू आहे. राज्याने केंद्राकडे त्वरित मदत मागून आर्मीच्या मदतीने प्रत्येक हॉस्पिटलमधील फायर ऑडिट आणि ऑक्सिजन ऑडिट केलं पाहिजे. राज्य सरकारला आपली जबाबदारी समजली पाहिजे. ह्या सगळ्याला जबाबदार असणारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी या वेळेस भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

"आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली"; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121