मालवणीत माफियांचा ‘फ्लॅट जिहाद’!

    27-Feb-2021   
Total Views | 503

flat jihad_1  H



दहशतीच्या माध्यमातून हिंदूंच्या मालमत्ता स्वस्तात लाटण्याचा डाव?




मुंबई:
मालाड मालवणीत सुरू असलेला ‘जिहादी उन्माद’ म्हणजे धार्मिक दहशतीआडून हिंदूंच्या मालमत्ता स्वस्तात लाटण्यासाठी सुरू असलेला ’फ्लॅट जिहाद’ सुरु आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्याविषयी विश्वसनीय सूत्रांकडून घेतलेल्या माहितीतून नागरिकांच्या पलायनाचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. मालाड पश्चिमेतील मालवणी भागातील ‘छेडा कॉम्प्लेक्स’मध्ये राहणार्‍या एका हिंदू युवकाच्या घरात घुसून मारण्याचा प्रयत्न दि. २३ फेब्रुवारीच्या रात्री झाला होता. त्यानंतर २४ फेब्रुवारीच्या दिवशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने संपूर्ण प्रकरणाचे घटनास्थळी जाऊन वार्तांकन केले होते.
 
 
 
 
 
 
त्यावेळी समोर आलेल्या माहितीतून मालवणीत सुरू असलेला प्रकार म्हणजे ‘फ्लॅट जिहाद’च असल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे. आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक भयभीत झाले असून फ्लॅट विकून जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ‘छेडा कॉम्प्लेक्स’मधील अनेक मोठ्या क्षेत्रफळाचे फ्लॅट्स लोक विकून गेल्याचे समजते. ‘छेडा कॉम्प्लेक्स’मधील एक साधारणतः १,१०० चौरस फुटांचा फ्लॅट केवळ ७५ लाखांत एका अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तीला विकला गेला असल्याची माहिती समोर आली. फ्लॅटचा मूळ मालक हिंदू होता. त्यामुळे अशाप्रकारे सामाजिक वातावरण बिघडवून त्या माध्यमातून कोट्यवधींची घरे काही कवडीमोल भावात विकत घेतली जातात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
 flat jihad_1  H
 
 

वादग्रस्त ‘छेडा कॉम्प्लेक्स’चा परिसर खूप मोठा आहे. मुंबईसारख्या शहरात इतका मोठा राहण्यायोग्य इमारतींचा परिसर ही दुर्मीळ बाब आहे. त्यामुळे पुनर्विकासाच्या माध्यमातून चटई क्षेत्र निर्देशांकानुसार बहुमजली इमारतीला परवानगी मिळू शकते. त्यामुळे काही हजार कोटींचा हा व्यवहार असू शकतो. भविष्यातील संधींचा विचार करून इथे पद्धतशीर दहशत पेरली जाते आहे का, हादेखील प्रश्न आहे. अशाप्रकारे फ्लॅट्स स्वस्तात विकत घेणारा एक ‘मसल मॅन’ असून त्याच्या माध्यमातून स्थानिक गुंडांना पाठबळ-प्रोत्साहन दिले जाते. तसेच त्याने आजवर काही इमारतींच्या पुनर्विकासात स्वतःचा व्यवसाय केला आहे. ‘छेडा कॉम्प्लेक्स’च्या आवारात ‘सीसीटीव्ही’द्वारे हा व्यक्ती लक्ष ठेवून असतो. संबंधित ‘सीसीटीव्ही’देखील त्याच्या खासगी गॅलरीतून लावला असल्याची माहिती आहे. ‘छेडा कॉम्प्लेक्स’मधील हा ‘फ्लॅट जिहाद’चा प्रकार गंभीर असून त्यात आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणी स्थानिक पोलीस आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
राजकीय उच्चपदस्थांशी संबंध
 
दरम्यान, मालवणीच्या या ‘मसल मॅन’चे राजकीय पक्षातील उच्चपदस्थांशी जवळचे संबंध असल्याचे समजते. त्यामुळे येथील वादग्रस्त प्रार्थनास्थळाला आजवर संरक्षण लाभले. तसेच त्याचे आर्थिक व्यवहारही सुरळीत सुरु राहिले.


सोमेश कोलगे 

महविद्यालयीन विद्यार्थी आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांतून सहभाग आणि प्राविण्य संपादन केले आहे. कायदा, न्यायशास्त्र विषयाची विशेष आवड.  संघाचा स्वयंसेवक . विविध विधायक कारणांसाठी न्यायालय तसेच  महिला आयोग, ग्राहक मंच अशा अर्ध-न्यायिक संस्थांकडे जनहितार्थ याचिका.  माहिती अधिकार, २००५  आणि तत्सम अधिकारांचा सकारात्मक उपयोग.

अग्रलेख
जरुर वाचा
इस्लामिक दहशतवादी संघटना हमासची वकीली करणाऱ्यांना कायदेशीर दणका

इस्लामिक दहशतवादी संघटना हमासची वकीली करणाऱ्यांना कायदेशीर दणका

काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून मारण्यात आले. राष्ट्रीय माध्यमांवर पाक व्याप्त काश्मीर येथे हमास या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन बाबत बातम्या आल्या. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ला हमास स्टाईल असल्याचे वृत्त झळकले. पुढे 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे हवाई हल्ले करून उडवले. युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. दि. १० मे २०२५ रोजी BDS movement नावाने काही संशयित लोकांनी कर्वेनगर भागात पॅलेस्टीन समर्थनार्थ ..

विनय ना मानत जलध जड़ गए तीन दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होय ना प्रीति

विनय ना मानत जलध जड़ गए तीन दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होय ना प्रीति'

काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'ने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केलेच, तर पाकिस्तानी हवाई दलालाही हादरवून टाकले. सोमवार, दि. १२ मे रोजी तिन्ही लष्कर प्रमुखांनी दिल्ली येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची संपूर्ण माहिती दिली. दरम्यान, भारतीय हवाई दलाचे डीजीएमओ, एअर मार्शल ए.के. भारती यांनी गोस्वामी तुलसीदास यांच्या 'रामचरितमानस' मधील "विनय न मानत जलधि जड़, गए तीन दिन बीत, बोले राम सकोप तब, भय बिनु ..

भारतानं हल्ला केल्याचं नाकारलं,

भारतानं हल्ला केल्याचं नाकारलं, 'त्या' पाकिस्तानच्या किराना टेकड्यांचं गुपित नेमकं काय?

(Pakistan Kirana Hills) पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतरही पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले जे भारतीय हवाई दलाने परतवून लावले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले. यानंतर अश्या चर्चा सुरु होत्या की, भारताने फक्त हवाई तळच नव्हे तर पाकिस्तानची अणुभट्टी 'किराणा हिल्स'वर ही लक्ष्य केले. मात्र भारतीय हवाई दलाचे डीजीएओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121