मालेगाव स्फोटप्रकरणी हिंदूंना अडकविण्याचा प्रयत्न पुन्हा उघड

साक्ष बदलण्यासाठी एटीएसने दबाव टाकल्याचा साक्षीदाराचा आरोप ; सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा

    29-Dec-2021   
Total Views | 245
Hindu _1


 

 
 
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने आपली साक्ष बदलली आहे. मंगळवार, दि. २८ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत साक्षीदाराने दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) परमबीर सिंह आणि श्रीराव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.



2008 मालेगाव ब्लास्ट केसमध्ये मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू आहे. न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्या न्यायालयात या प्रकरणात दैनंदिन सुनावणी सुरु आहे. आज झालेल्या सुनावणीत ह्या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक ४० यांनी अतिशय धक्कादायक खुलासे न्यायालयासमोर केले.
 
 
 
एटीएस अधिकाऱ्यांचा साक्षीदारावर दबाव



साक्षीदाराने न्यायालयाला साक्ष देताना सांगितले की, एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर आपल्या म्हणण्यानुसार जवाब दिला नाही तर त्यांच्या कुटुंबाला इजा पोहचवण्यात येईल, असे म्हणत दबाव टाकला होता. तसेच आपल्या जबाबात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या नावंचा उल्लेख करावा ह्यासाठी एटीएस दबाव टाकत असल्याचा दावा साक्षीदाराने मंगळवारी झालेल्या सुनावणीत केला.



या उच्चपदस्थ व्यक्तींमध्ये उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, तत्कालीन कार्यकर्ते सुनील देवधर, काकाजी, इंद्रेश कुमार यांची नावे आपल्या जबाबात नोंदवावी, यासाठी एटीएस साक्षीदारांवर दबाव टाकत असल्याची माहिती साक्षीदाराने कोर्टात दिली. साक्षीदाराने एटीएसचे तत्कालीन अधिकारी परमवीर सिंह आणि डीसीपी श्रीराव यांच्या संदर्भात आक्षेप सुद्धा साक्षीदाराने नोंदवले आहेत. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये 15 साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली आहे.
 
 
 
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा इतिहास



29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिद परिसरात मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने तीन वर्षे प्राथमिक तपास केल्यानंतर हे प्रकरण 2011 मध्ये एनआयएकडे वर्ग करण्यात आले होते. एनआयएच्या



मुंबईतील विशेष न्यायालयात सध्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यासह आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी
आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.



 
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121