तबलिगी जमात म्हणजे इस्लामिक कट्टरतावादाचा कारखाना : विहिंप

सौदी अरेबियाप्रमाणे भारतातदेखील बंदी घाला ; विश्व हिंदू परिषदेची मागणी

    17-Dec-2021
Total Views | 162

tabalighi_1  H
मुंबई : विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) भारतात तबलिगी जमातवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांना पाठिंबा देणार्‍या दारुल उलूम देवबंद आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली. विहिंपने जारी केलेल्या पत्रकात तबलीगी, तबलिगी जमात आणि इज्तिमावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. विहिंपचे केंद्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनीही सौदी अरेबियाने तबलिगी जमातवर घातलेल्या बंदीचे समर्थनदेखील केले.
 
 
 
 
 
तबलिगी जमात आणि निजामुद्दीनचा मरकझ हे केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी संकट असल्याचेही आलोक कुमार यांनी म्हंटले आहे. त्यांना इस्लामिक कट्टरतावादाचा कारखाना आणि दहशतवादाचे पुरस्कर्ते असल्याचे सांगत त्यांच्यावर भारतात संपूर्ण बंदी घालण्याची मागणीही केली.
 
 
पत्रकात त्यांनी म्हंटले आहे की, "रशियानेही तबलिगी जमातच्या कृत्यांमुळे त्यांच्यावर बंदी घातली. दारुल उलूम हे देवबंदमधील तबलीगी जमातचे जन्मस्थान आहे. १९२६मध्ये निजामुद्दीनपासून सुरू झालेल्या तबलिगी जमातने मेवात प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण करण्यात यश मिळवले. सध्या १०० देश आणि करोडो लोकांना याची लागण झाली आहे. भारताच्या सर्व भागात मशिदी आणि मदरशांमध्ये सापडलेली शस्त्रे आणि दहशतवादी हे कुठेतरी तबलिगी जमातच्या पसरलेल्या विचारसरणीचे परिणाम आहेत."
 
 
पुढे त्यांनी म्हंटले आहे की, "निजामुद्दीन मरकझमध्ये वहाबी विचारसरणीचे प्रशिक्षण दिले जाते. निजामुद्दीनमधून निघून गेल्यावर अनेकांनी जगभर कट्टरता पसरवली. इज्तिमा, मशिदी आणि मदरशांमध्ये या बैठका होतात. जगातील सर्व दहशतवादी पक्ष तबलिगी जमातशी संबंधित लोकांनी सुरू केल्या आहेत. मरकझ निजामुद्दीनचा संबंध भारतातील स्वामी श्रद्धानंद यांच्या हत्येशी, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यापासून गोध्रा ट्रेन जाळण्याच्या घटनेशी आहे."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121