राहुल गांधींची शिवाजी पार्कवरील सभा अखेर रद्द

मात्र पुढील सभा शिवाजी पार्कवरच होणार : भाई जगताप

    15-Dec-2021   
Total Views | 97
 
RAHUL-GANDHI-2_1 &nb
 
 
 
मुंबई : अखिल भारतीय काँग्रेसचे माही अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची मंगळवार, दि. २८ डिसेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार सभा अनेक घडामोडींनंतर अखेर रद्द करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या बाबत मंगळवार, दि. १४ डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधत खुलासा केला. तत्पूर्वी या सभेसाठी काँग्रेसतर्फे न्यायालयात करण्यात आलेली याचिका देखील पक्षातर्फे मागे घेण्यात आली होती. ज्यावरून अनेक चर्चा आणि तर्क वितर्क लढविले जात होते. मात्र, अखेर भाई जगताप यांनी यावर खुलासा दिला आहे.
 
 
भाई जगताप म्हणाले की, 'सध्या देशभरासह महाराष्ट्र आणि मुंबईत ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण आढळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रात काही निर्बंध लावण्यात आले असून त्या नियमांचे पालन म्हणून काँग्रेसचा हा मेळावा रद्द करण्यात येत आहे. राहुल गांधी यांची सभा मुंबईत आणि विशेष म्हणजे शिवाजी पार्क येथे व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्याचा पाठपुरावा देखील आम्ही सरकारकडे अनेक दिवस केला, मात्र सरकारतर्फे कुठलाही प्रतिसाद न आल्याने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला होता. सध्या जरीची हा मेळावा रद्द करण्यात येत असला तरी राहुल गांधी यांचा पुढील मेळावा आणि पुढील सभा ही शिवाजी पार्क येथेच होईल,' असे भाई जगताप यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला नाव न घेता सूचित केल्याचे बोलले जात आहे.
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानकडून हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर, हवाई तळांना लक्ष्य; कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

पाकिस्तानकडून हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर, हवाई तळांना लक्ष्य; कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

( India-Pakistan Updates) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून केलेल्या या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तान सातत्याने भारतातील शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले सुरू असून काल रात्री त्यांनी उधमपूर, पठाणकोट आणि भटिंडा येथील भारतीय हवाई तळांवर हल्ले केले, अशी माहिती आज शनिवार, दि. १० मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच पाकिस्तानने ..

पाकिस्तानला मोठा झटका! जिथून सोडत होता ड्रोन तोच तळ उध्वस्त

पाकिस्तानला मोठा झटका! जिथून सोडत होता ड्रोन तोच तळ उध्वस्त

पहलगाम इस्लामिक दहशतवाही हल्ल्याचा बदला म्हणून सुरु केलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमध्ये कहर माजवला आहे. बुधवार रात्री पासून चालू असलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवार आणि शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील तीन हवाई तळांवर (सुकूर, रफिकी, रहिम यार खान) भारताने हल्ला केल्याचे निदर्शनास येत असून रावळपिंडीच्या चकवाल जिल्ह्यातील चकलाला आणि मुरीद तर झांग जिल्ह्यातील शोरकोट येथील नूर खान एअरबेसवर हल्ला करत पाकिस्तानची झोप उडवल्याचे पाहायला मिळतेय...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121