मुंबईकर श्रेयस अय्यरचे शतकी पदार्पण

कसोटीसाठी श्रेयसने पाहिली तब्बल ४ वर्षे वाट

    26-Nov-2021
Total Views | 103

Shreyas Iyer_1  
नवी दिल्ली : कानपूर येथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने सर्वबाद ३४५ अशा धावा केल्या आहेत. भारतीय फलंदाजांनी संयमी खेळी करताना एक सन्मानार्थ लक्ष न्यूझीलंडच्या संघासमोर ठेवले आहे. यावेळी मुंबईकर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी करत पदार्पणात शतकी खेळी करण्याचा विक्रम केला आहे. श्रेयसने एकदिवसीय आणि टी-२० मध्ये देशाचे नेतृत्व केले आहे. पण कसोटी खेळण्याची संधी मिळण्यासाठी त्याला ४ वर्ष वाट पाहावी लागली. या सामन्यात शतक झळकावून त्याने एक स्वप्नवत पदार्पण केले आहे. अशी कामगिरी करणारा तो १६वा भारतीय खेळाडू ठरला.
 
पहिल्या दिवसाखेर श्रेयसने रवींद्र जडेजाच्या साथीने शतकी भागीदारी करत भारतीय संघाला २५०चा आकडा पार करून दिला. तर न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. पहिल्या दिवशी श्रेयसने नाबाद ७५ धावा केल्या होत्या. दुसऱ्यादिवशी तो शतकी वाटचाल करेल अशी अपेक्षा होती. त्याने १५७ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. कानपूरच्या मैदानावर शतक झळकवणारा तो गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर दुसरा खेळाडू ठरला.
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121