न्यूझीलंडविरुद्ध संघ जाहीर पण चाहते पुन्हा नाराज, म्हणाले...

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार म्हणून के. एल. राहुल

    10-Nov-2021
Total Views | 98

Sanju_1  H x W:
 
 
मुंबई : भारतीय संघ आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेतून अव्वल १२मध्येच बाद झाला. तर दुसरीकडे रवी शास्त्रीचा कार्यकाळ संपताच भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची निवड करण्यात आली आणि विराटने टी - २० संघाचे कर्णधारपद सोडले. अशामध्ये आता आगामी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, रोहित शर्माकडे भातीय टी २० संघाचे कर्णधारपद आणि के. एल. राहुलकडे उपकर्णधारपद सोपवले आहे. अशामध्ये आता चाहत्यांकडून सोशल मिडियावर संघ व्यवस्थापनावर टीका करण्यात येत आहे.
 
असा असेल संघ...
 
 
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
 
सोशल मिडीयावर चालवला #JusticeForSanjuSamson
 
 
भारतीय संघाची निवड होताच सोशल मिडीयावर संजू सॅमसनसोबत अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. संजूने आयपीएल २०२१मध्ये १४ सामन्यात १३९च्या स्ट्राईक रेटने ४८४ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतक तर २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो संपूर्ण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज आहे. "चांगली कामगिरी असतानाही त्याचा संघात समावेश का नाही केला गेला?" असे काही चाहत्यांनी विचारले आहे. तर, यावरून आता सध्या #JusticeForSanjuSamson असा हॅशटॅग चालवला जात आहे. एवढेच नव्हे तर संघ व्यवस्थापन भेदभाव करते, असेदेखील आरोप चाहत्यांकडून करण्यात येत आहे.
 
१६०० धावा करणाऱ्या खेळाडूकडे निवड समितीचे दुर्लक्ष : हरभजन सिंग
 
न्यूझीलंड विरुद्धच्या ३ टी२० सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी इंडिया 'ए' संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, या दोन्ही संघात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने अधिक धावा करणाऱ्या खेळाडूकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हरभजनसिंगने आपली खंत व्यक्त केली.
 
 
 
 
"२०१८-१९च्या रणजी हंगामात ८५४ आणि २०१९-२० च्या हंगामात ८०९ धावा काढून त्याने संघाला ' चॅम्पियन' बनवलं. तो या हंगामातही फॉर्मात आहे. तरीही इंडिया 'ए' च्या संघामध्येही त्याची निवड झाली नाही. जॅक्सनने अजून काय केले पाहिजे हे निवड समिती त्याला सांगेल का?" असे म्हणत भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंगने निवड समितीवर टीका केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121