विकासकाऐवजी पालिकेकडून कोट्यवधींची रस्ते उभारणी

घाटकोपरमधील खळबळजनक प्रकार

    29-Oct-2021   
Total Views | 98

vip_1  H x W: 0
मुंबई :  घाटकोपर निलयोग मॉल ते घाटकोपर लिंक रोडला जोडणारा जवाहर रस्ता सध्या वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. कारण, या रस्त्यावरील वस्तीचे पुनर्वसन ‘एसआरए’ योजनेअंतर्गत विकासकाने केले. त्यावेळी हा रस्ता बनवण्यासाठी अनेक समस्या उभ्या राहिल्या. विकासकाने बांधायचा हा रस्ता २०२० साली महानगरपालिकेनेच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधला. त्यामुळे या रस्त्याच्या हस्तांतराबाबत स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.२०१५ साली मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी ‘एन’ वॉर्ड आणि गौरीशंकर वाडी पुनर्विकास करणार्‍या विकासकाने संयुक्तपणे या रस्त्यावर अहवाल बनवून आयुक्तांकडे सुपूर्द करावा, असे सूचित केले होते. त्यानंतर हा रस्ता बनवावा आणि तो महानगरपालिकेला सुपूर्द करावा, असेही त्यात नमूद केले होते. त्यानंतर अचानक हा रस्ता २०२० साली बांधण्यात आला. त्यासाठी अंदाजे दहा ते १२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा अंदाज आहे. यावर घाटकोपरच्या जागरूक नागरिकांनी प्रश्न केले आहेत की, हा रस्ता बनवताना तत्कालीन आयुक्तांंनी जो अहवाल बनवायला सांगितला होता तो बनवला का? जर तो अहवाल बनवला असेल, तर त्याबाबत महानगरपालिका विकासक किंवा कमिशनर यांच्याकडे नोंद आहे का? तसेच हा रस्ता विकासकाने नाही, तर महानगरपालिकेने बनवला आहे. विकासकाने रस्ता बनवून महानगरपालिकेला सुपूर्द करायचा, असे स्पष्ट असताना महानगरपालिकेने हा रस्ता का बनवला? महानगरपालिकेने रस्ता बनवला असल्यामुळे विकासकाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचला आहे. विकासकाचा खर्च वाचवण्यासाठी महानगरपालिकेने हा रस्ता बांधला का? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.





रस्तेनिर्माणासाठी विरोध नाही





जवाहर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला याबद्दल विरोध नाही. कारण मार्ग बनणे महत्त्वाचे होते. मात्र, तो ज्या पद्धतीने बनला, त्याबद्दल अनेक प्रश्न उठत आहेत. हा रस्ता विकासकाने बनवायचा असताना तो रस्ता महानगरपालिकेने कोणाच्या पैशातून बनवला? तसेच हा रस्ता बनवताना प्रशासकीय नियम आणि सूचना यांचे पालन केले गेले का? भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी सोबतच घाटकोपरचा जागरूक नागरिक म्हणून मला हा प्रश्न पडला आहे. या रस्त्याचे हस्तांतर महानगरपालिकेकडे झाले, असे कुठे नमूद आहे का? कारण महानगरपालिकेकडे हा रस्ता हस्तांतरित झाल्याशिवाय या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती किंवा इतर काम महानगरपालिका करू शकत नाही. हा रस्ता महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाला का? नसेल तर तो त्वरित व्हावा, अशी आमची मागणी आहे.




- अजय बागल, महामंत्री, भाजप, घाटकोपर विधानसभा



योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121