बोरिवली नॅशनल पार्क रेस्क्यू टीमचे 'मिशन रत्नागिरी'; 'त्या' बिबट्याला जेरबंद करणार

    07-Sep-2020
Total Views | 392

leopard _1  H x


ग्रामस्थांच्या दबावानंतर बिबट्या पकड मोहिम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यात रत्नागिरीतील मेर्वीत बिबट्याच्या हल्ल्यात एक ग्रामस्थ जखमी झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'चे (नॅशनल पार्क) 'बिबट्या बचाव पथक' रत्नागिरीत दाखल झाले आहे. ग्रामस्थावर हल्ला करणारा बिबट्या मादी असून ती पिल्लांसमेवत या परिसरात असल्याने या बिबट्याला पकडणे पिल्लांच्या भविष्याच्या दृष्टीने कितपत योग्य ठरेल, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. 
 
 
 
रत्नागिरीच्या जांभूळआड गावात शुक्रवारी ग्रामस्थ जनार्दन चंदुरकर यांच्यावर बिबट्याचा हल्ला झाला. सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास गुरे चरायला सोडून घरी परतताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविला. चंदुरकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हल्ला करणारा बिबट्या हा दोन पिल्लांसोबत त्याठिकाणी होता. त्यामुळे हा हल्ला मादी बिबट्याने आपल्या लहान पिल्लांच्या सुरक्षेसाठी बचावात्मक दृष्टीने केल्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीपासून या परिसरात 'मानव-बिबट्या संघर्षा'च्या घटना वारंवार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी येथील दुचाकी स्वार चालकांवर बिबट्या हल्ला करत होता. अशा परिस्थितीत शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी झाली. त्यामुळे वन विभागाने या परिसरातील बिबट्याला पकडण्याची तयारी सुरू केली आहे. 
 
 
leopard _1  H x 
 
 
या कामासाठी रविवारी रात्री मुंबईतील बोरिवली 'नॅशनल पार्क'चे 'बिबट्या बचाव पथक' रत्नागिरी दाखल झाले. हल्ल्यास कारणीभूत असलेल्या बिबट्याला पकडण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून मिळाल्याची माहिती रत्नागिरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका लगड यांनी दिली. या कामात वैद्यकीय मार्गदर्शनाकरिता राष्ट्रीय उद्यानाच्या माजी पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. विनया जंगले यांना पाचरण्यात आले आहे. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी 'कॅमेरा ट्रॅप' लावले असून पिंजरेही लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हल्ल्यास कारणीभूत असलेली बिबट्या मादी असून तिच्यासोबत पिल्ले आहेत. अशा परिस्थितीत या मादी बिबट्याला पकडल्यास तिच्या पिल्लांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121