गोराई-मनोरीतील कांदळवनांना संरक्षण; 'एमटीसीडीसी'ची ५०० एकर कांदळवन जमीन वन विभागाला मिळणार

    21-Sep-2020
Total Views | 160
mangrove _1  H


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा आदेश 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गोराई आणि मनोरी खाडीपरिसरातील 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'च्या (एमटीडीसी) मालकीची जवळपास ५०० एकर कांदळवन आच्छादित जमीन वन विभागाकडे हस्तांतरित केली जाणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी घेतलेल्या दोन्ही विभागांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 'एमटीडीसी'च्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा केल्यानंतर ही जागा वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'च्या (मॅंग्रोव्ह सेल) ताब्यात देण्यात येईल. 
 
 
 
 
मुंबई महानगर परिक्षेत्रातील कांदळवनांमध्ये अतिक्रमण दिवसागणिक वाढते आहे. ही बाब लक्षात घेऊन आता वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या मालकीच्या कांदळवन आच्छादित जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरमधील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील कांदळवनांच्या जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही प्रक्रिया दोन महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी विभागांना दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी गोराई आणि मनोरी भागात 'एमटीडीसी'च्या मालकीची जमीन 'कांदळवन कक्षा'च्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला. ठाकरे यांनी वन विभाग आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा केली. 
 
 
 
गोराई आणि मनोरी या भागामधील अंदाजे ९०० एकर कांदळवन आच्छादित जागेपैकी काही जागा या संरक्षित वनक्षेत्र म्हणून त्या राखीव आहेत. या व्यतिरिक्त जवळपास ५०० एकर राखीव नसलेली कांदळवन आच्छादित जमीन ही कांदळवन कक्षाला हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती 'एमटीडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी दिली. या जागांचा सातबाराचा उतारा 'एमटीडीसी'च्या नावे असून संचालक मंडळाच्या बैठकीतील अंतिम परवानगीनंतर त्या 'कांदळवन कक्षा'च्या ताब्यात देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. या जागा ताब्यात आल्यानंतर त्यांना राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, अशी माहिती 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121