भूमिपूजनासाठी प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराची माती अयोध्येला

    02-Aug-2020
Total Views | 55

ram_1  H x W: 0
 
उल्हासनगर : उल्हासनगराहून वाहणाऱ्या उल्हासनदीचे पवित्र जल व अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराची पवित्र माती काल अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी बजरंग दल व विश्व हिंदु परीषदेच्या वतीने स्पीडपोस्टद्वारे पाठविण्यात आली. भाजपचे नगरसेवक महेश सुखरामानी यांनी पत्रकारांशी बोलतांना माहिती दिली. अयोध्येत साकारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदीराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
 
 
 
या शुभ दिनाचे औचित्य साधून उल्हासनदीचे पवीत्र जल व अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराची पवित्र माती आज बजरंग दल व विश्व हिदू परीषदेच्या कार्यकर्त्यांनी स्पीड पोस्टद्वारे अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी पाठवली आहे. उल्हासनगर नंबर दोन येथील चद्रशेखर आझाद शाळे जवळील हनुमान मंदिरात वैदिक पध्दतीने होम हवन करून उल्हासनदीचे पवित्र जल व पांडवकालीन शिवमंदिराची पवित्र मातीची पूजा करण्यात आली. यावेळी बजरंग दलाचे व विश्व हिंदू परिषदचे चंद्रकांत मिश्रा, महेश सुखरामानी, डॉ.एस.बी.सिंग, कमलेश निकम आदी रामभक्त प्रामुख्याने उपस्थित होते.




अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121