कोरोनानंतर आता क्रिकेटमध्ये नवी नियमावली... आयसीसीची नवी बंधने!

    08-Jul-2020
Total Views | 56

icc_1  H x W: 0
नवी दिल्ली : कोरोनामुळे जगभरातील क्रीडा विश्व स्तब्ध झाले होते. या महामारीनंतर आयसीसीने सर्व स्तरांवरील सामने रद्द केले होते. त्यानंतर आता तब्बल १२० दिवसानंतर ८ जुलैपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळवला जात आहे. अद्याप कोरोनावर लस तयार नसल्यामुळे काही नियम आणि अटींसह पुढील सर्व सामने आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती यापूर्वीच आयसीसीने दिली होती. आता आयसीसीची नवी नियमावली जाहीर झाली असून काही बंधने खेळाडूंवर घालण्यात येणार आहेत.
 
काय आहेत नवे बदल ?
 
> कोरोना विश्वाणु हा संक्रमणाने पसरत असल्याने आता पुढील सूचनेपर्यंत क्रिकेटचे सामने हे विना प्रेक्षक खेळवण्यात येणार आहेत.
 
> स्टेडीयमवर ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले असून खेळाडूंनाही सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहेत.
 
> गोलंदाजांनी फलंदाजाला बाद केल्यानंतर पहिल्यासारखे सेलिब्रेशन करता येणार नाही. खेळाडू एकमेकांना एल्बो टच करू शकतात.
 
> सामने विना प्रेक्षक आयोजित करण्यात येणार असले तरी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या स्क्रीन लावून दर्शकांचा आवाजही येणार आहे.
 
> क्रिकेटमधला सगळ्यात मोठा बदल म्हणजे गोलंदाजानं चेंडू चमकवण्यासाठी आता थूक लावता येणार नाही. जर खेळाडू असे करतील तर त्यांना ताकीद देण्यात येईल. सतत असे झाल्यास खेळाडूंना दंडही भरावा लागेल. खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी आपल्या घामाचा वापर करू शकतात.
 
> एखाद्या खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्याची बदली म्हणून दुसरा खेळाडू खेळवण्यात येईल. बदली खेळाडूला सामनाधिकारी मंजूरी देतील. पण, हा नियम वन डे आणि ट्वेंटी-२० सामन्यांसाठी लागू नसेल.
 
> प्रत्येक सामन्यासाठी स्थानिक पंचांची निवड केली जाईल.
 
> प्रत्येक संघाला प्रत्येक डावासाठी अतिरिक्त डीआरएस दिला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात प्रती डावासाठी तीन,तर मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी दोन डीआरएस घेता येणार आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121